शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद,नगरपंचायत स्थापनेच्या उद्घोषणेस मुदतवाढ

By admin | Updated: June 1, 2014 00:23 IST

राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक उद्घोषणेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाशिम : ग्राम पंचायतींद्वारा स्थानिक कारभार बघितल्या जात असलेल्या, राज्यातील ७८ तालुका मुख्यालयी नगर परिषद व नगर पंचायती स्थापन करण्यासाठी, राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक उद्घोषणेस मुदतवाढ देण्यात आली आहे. तालुका मुख्यालयी नगर परिषद वा नगर पंचायती स्थापन करण्यासाठी, राज्य शासनाने गत १ मार्च २0१४ रोजी, अधिसूचनेद्वारे प्राथमिक उद्घोषणा प्रसिद्ध केली होती; परंतु लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे काही जिल्ह्यात प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती, सूचना मागविण्याची कार्यवाही करता येणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे सदर कार्यवाही पूर्ण करण्याच्या दृष्टीने, सदर उद्घोषणा प्रसिद्ध करणे व हरकती, सूचना मागविण्यासाठी राज्य शासनाने ३0 जूनपर्यत मुदतवाढ दिली आहे. राज्यात अनेक तालुक्यांच्या मुख्यालयी, लोकसंख्या वाढल्यामुळे गावांचा विस्तार होऊनही, त्या गावांचा कारभार ग्राम पंचायतींच्याच हाती असल्याच्या पार्श्‍वभूमीवर, त्या गावांचा विकास खुंटला आहे. त्यामुळे अशा तालुका मुख्यालयी नगरपरिषदा किंवा नगरपंचायती स्थापन करण्याची बाब, बरेच दिवसांपासून शासनाच्या विचाराधीन होती. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याने, राज्य शासनाने ३0 मे रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात आवश्यक ती अधिसूचना प्रसिद्ध करुन, विहित कालावधीत प्राथमिक उद्घोषणेवर हरकती, सूचना मागविण्याची कार्यवाही करण्यास ३0 जूनपर्यत मुदतवाढ दिली आहे. तशी कार्यवाही विहित मुदतीत करण्याचे निर्देशही सर्व संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. सदर उद्घोषणेच्या प्रती नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्र म्हणून जाहीर करावयाच्या क्षेत्रात ठळक ठिकाणी लावण्याचेही सूचित करण्यात आले आहे.राज्यात नव्याने नगर परिषद, नगर पंचायत स्थापन करावयाचे प्रस्तावित असलेल्या तालुका मुख्यालयांमध्ये, जळगाव जिल्ह्यातील बोदवड व मुक्ताईनगर, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव-वडफळ्या-रोशमाळ व अक्कलकुवा, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव व फुलंब्री, जालना जिल्ह्यामधील धनसावंगी, बदनापूर, मंठा व जाफ्राबाद, परभणी जिल्ह्यामधील पालम, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा नागनाथ, बीड जिल्ह्यातील शिरुर, वडवानी, पाटोदा व आष्टी, लातूर जिल्ह्यामधील जळकोट, रेणापूर, चाकूर, देवणी(बु) व शिरूर अनंतपाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा(बु) व वाशी, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर व नायगाव, अमरावती जिल्ह्यामधील भातकुली, नांदगाव खंडेश्‍वर, धारणी व तिवसा, अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी, वाशिम जिल्ह्यामधील मानोरा व मालेगाव, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, झरी, बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव व कळंब, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व मोताळा, नागपूर जिल्ह्यामधील हिंगणा, भिवापूर, कुही व पारशिवणी, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, मोहाडी, साकोली व लाखनी, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, सेलू, कारंजा व आष्टी, गोंदिया जिल्ह्यामधील सडकअर्जुनी, अर्जुनी (मोरगाव), गोरेगाव व आमगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना, सावली, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, नागभीड, चिमूर व सिंदेवाही आणि गडचिरोली जिल्ह्यामधील मूलचेरा, कोरची, भामरागड, धानोरा, सिरोंचा, कुरखेडा, एटापल्ली, आरमोरी, चार्मोशी व अहेरी या ग्रामपंचायत असलेल्या गावांचा समावेश आहे.