शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अतिवृष्टीचा ९,०१४ पीकविमाधारक शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम- जिल्ह्यात गत महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याचा ९,०१४ पीक विमाधारक शेतकऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम- जिल्ह्यात गत महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याचा ९,०१४ पीक विमाधारक शेतकऱ्यांना फटका बसला. या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे तक्रार केली असून, पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यापैकी ५,३९१ शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन सर्वेक्षण केले आहे.

यंदाच्या हंगामात २,२९,५९२ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. त्यात ९५,८८३ कर्जदार, तर १,३३,७०९ बिगर कर्जदार शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी १५.८३ कोटी रुपये भरले आहेत. शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवून अवघा महिनाभराचा काळही उलटला नसताना जुलै महिन्याच्या मध्यंतरी अतिवृष्टीने थैमान घालत पिकांचे नुकसान केले. जिल्ह्यातील ९,०१४ पीक विमाधारक शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पीक विमा मंजूर करण्याच्या मागणीसाठी निर्धारित ७२ तासांच्या मुदतीत पीकविमा कंपनीकडे तक्रारी केल्या. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या शेताला भेटी देऊन नुकसानाची पाहणी करीत नोंदी घेतल्या.

-----

मंगरुळपीर, मानोऱ्यात नुकसानाचे प्रमाण अधिक

मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाचे प्रमाण अधिक आहे. मंगरुळपीर तालुक्यातील ४,७८३, तर मानोरा तालुक्यातील २,८८७ शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी तक्रारी केल्या आहेत.

---------

महिना उलटूनही ३,६३४ ठिकाणचे सर्वेक्षण प्रलंबितच

जिल्ह्यात यंदाही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यासह जमिनी खरडून गेल्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडले आहेत. एकूण ९,०१४ शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे तक्रार केली असून, महिना उलटला तरी ३,६३४ ठिकाणचे सर्वेक्षण झाले नाही.

---------------

तालुकानिहाय तक्रारी आणि सर्वेक्षण

तालुका - तक्रारी - सर्वेक्षण

वाशिम - १,०७५ - १,०६४

कारंजा - ८६ - ८६

मंगरुळपीर - ४,७८३ - २,६०५

मानोरा - २,८८७ - १,४७३

रिसोड - १३३ - ११४

मालेगाव - -५० - ४९

---------------

कोट: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी विमा भरपाई मंजूर करण्यासाठी ९,०१४ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून या पीक नुकसानाचे निकषानुसार सर्वेक्षण केले जात आहे. त्यात ५,३९१ शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली आहे.

- शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम