शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

अतिवृष्टीचा ९,०१४ पीकविमाधारक शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम- जिल्ह्यात गत महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याचा ९,०१४ पीक विमाधारक शेतकऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम- जिल्ह्यात गत महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याचा ९,०१४ पीक विमाधारक शेतकऱ्यांना फटका बसला. या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे तक्रार केली असून, पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यापैकी ५,३९१ शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन सर्वेक्षण केले आहे.

यंदाच्या हंगामात २,२९,५९२ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. त्यात ९५,८८३ कर्जदार, तर १,३३,७०९ बिगर कर्जदार शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी १५.८३ कोटी रुपये भरले आहेत. शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवून अवघा महिनाभराचा काळही उलटला नसताना जुलै महिन्याच्या मध्यंतरी अतिवृष्टीने थैमान घालत पिकांचे नुकसान केले. जिल्ह्यातील ९,०१४ पीक विमाधारक शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पीक विमा मंजूर करण्याच्या मागणीसाठी निर्धारित ७२ तासांच्या मुदतीत पीकविमा कंपनीकडे तक्रारी केल्या. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या शेताला भेटी देऊन नुकसानाची पाहणी करीत नोंदी घेतल्या.

-----

मंगरुळपीर, मानोऱ्यात नुकसानाचे प्रमाण अधिक

मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाचे प्रमाण अधिक आहे. मंगरुळपीर तालुक्यातील ४,७८३, तर मानोरा तालुक्यातील २,८८७ शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी तक्रारी केल्या आहेत.

---------

महिना उलटूनही ३,६३४ ठिकाणचे सर्वेक्षण प्रलंबितच

जिल्ह्यात यंदाही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यासह जमिनी खरडून गेल्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडले आहेत. एकूण ९,०१४ शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे तक्रार केली असून, महिना उलटला तरी ३,६३४ ठिकाणचे सर्वेक्षण झाले नाही.

---------------

तालुकानिहाय तक्रारी आणि सर्वेक्षण

तालुका - तक्रारी - सर्वेक्षण

वाशिम - १,०७५ - १,०६४

कारंजा - ८६ - ८६

मंगरुळपीर - ४,७८३ - २,६०५

मानोरा - २,८८७ - १,४७३

रिसोड - १३३ - ११४

मालेगाव - -५० - ४९

---------------

कोट: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी विमा भरपाई मंजूर करण्यासाठी ९,०१४ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून या पीक नुकसानाचे निकषानुसार सर्वेक्षण केले जात आहे. त्यात ५,३९१ शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली आहे.

- शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम