शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीत सर्वांनाच रस; जिल्हाध्यक्षांचा लागणार कस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

संतोष वानखडे वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २८ गणांसाठी ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. ...

संतोष वानखडे

वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २८ गणांसाठी ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी प्रमुख पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा परिषदेत पक्षाला नंबर वन बनविण्यासाठी जिल्हाध्यक्षांचा चांगलाच कस लागणार आहे.

वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करून पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. गतवेळी जिल्हा परिषदेत राकाॅ हा ‘नंबर वन’चा पक्ष ठरला होता. दुसऱ्या क्रमांकावर काॅंग्रेस आणि तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडी होती. पोटनिवडणुकीत कुणाला किती जागा मिळतील यावर जिल्हा परिषदेत नंबर वन कोण ठरणार आणि पर्यायाने अध्यक्षपद कुणाकडे येणार हे अवलंबून राहणार आहे. स्वपक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष कामाला लागले असून, गतवेळचे संख्याबळ कायम ठेवण्याबरोबरच संख्याबळ वाढविण्यात जिल्हाध्यक्षांचा चांगलाच कस लागणार आहे. यात कुणाला यश येणार, कुणाचे नेतृत्व गुण कमी पडणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

................

काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पहिल्यांदाच जाणार निवडणुकीला सामोरे

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीला काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार झनक पहिल्यांदाच सामोरे जात आहेत. ओबीसी आरक्षणामुळे काॅंग्रेसची दाभा गटाची जागा कमी झाली आहे. दाभा गटाबरोबरच अन्य काही गटातही काॅंग्रेस उमेदवार निवडून आणण्यात झनक यांचे राजकीय कसब दिसून येणार आहेत. दुसरीकडे अमित झनक यांचे ‘होम ग्राऊंड’ असलेल्या गोभणी गटात गतवेळी जनविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला होता. आता गोभणी गटातही पोटनिवडणूक होत असल्याने गतवेळच्या पराभवाचा वचपा काढला जातो की महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला सोडली जाते? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

.....................

‘नंबर वन’ कायम ठेवण्यासाठी राकाॅंची धडपड!

गतवेळी जिल्हाध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात राकाॅंने सर्वाधिक १२ जागा जिंकून जिल्हा परिषदेत ‘नंबर वन’चा मान मिळविला होता. ओबीसी आरक्षणामुळे राकाॅंच्या तीन जागा रिक्त झाल्या असून, या तीन जागा जिंकण्याबरोबरच आणखी काही जागा निवडून कशा आणता येतील, याचे नियोजन राकाॅंने केल्याचे दिसून येते. यात कितपत यश येते? हे निकालानंतरच दिसून येईल.