शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

‘अनलॉक’मध्येही ग्रामीण भागातील सीमा ‘लॉक’च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:51 IST

भर जहॉंगिर : अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात वाशिम जिल्ह्याचा समावेश असून, ७ जूनपासून अनलॉकच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाली असली ...

भर जहॉंगिर : अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात वाशिम जिल्ह्याचा समावेश असून, ७ जूनपासून अनलॉकच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी, ग्रामीण भागातील सीमा अद्यापही बंदच असल्याचे भर जहॉंगिर परिसरातील मोहजाबंदी-लोणी-वढव या रस्त्यावरून दिसून येते.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात निर्बंध कठोर करण्यात आले होते. जिल्ह्याच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या होत्या. नजीकच्या हिंगोली, परभणी, बुलडाणा जिल्ह्यांतून येणारे रस्ते स्थानिक पोलीसपाटील, तंटामुक्ती समिती, ग्रामपंचायतीने सीमेवरील रस्त्यावर दगड, मुरूम, झाडाच्या फांद्या टाकून बंद केल्या होत्या. यादरम्यान या सीमेजवळील भागातील गावांच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. साखरा, केलसुला, ब्राह्मणी, कापडसिंगी, रायगाव सावरगाव, गांधारी, शिवणी जाट, देऊळगाव, सोनुना, वढव, हिरडव, आरडव, पहुर, दाभा अशा विविध गावांतील नागरिकांना त्यांच्या स्वजिल्ह्यापेक्षा रिसोड, वाशिम बाजारपेठ जवळ आहे. त्यामुळे विविध कामानिमित्त तसेच साहित्य, माल खरेदीसाठी या गावातील नागरिक हे रिसोड, वाशिमला जातात. जिल्हा सीमावर्ती भागामध्ये काही गावांनी थेट जिल्हा सीमाच बंद केल्याने येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला. दरम्यान, ७ जूनपासून अनलॉकच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाल्याने जिल्हा सीमावर्ती भागातील रस्तेही मोकळे होणे अपेक्षित आहे. मात्र, मोहजाबंदी-लोणी-वढव या रस्त्यावर अजूनही मुरूम, झाडाच्या फांद्या जैसे थे असल्याने हा मार्ग बंदच आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

...

कोट बॉक्स

मागील दोन महिन्यांपासून रस्त्यावर दगड, मुरूम टाकून मुख्य रस्ताच बंद केल्याने या भागातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा. गांधारी गाव हे लोणार तालुक्यामध्ये आहे. परंतु आम्हाला मुख्य बाजारपेठ रिसोड जवळ आहे. आतातरी बंद केलेले रस्ते पूर्ववत करावे.

अ‍ॅड. शिवाजी सानप,

सामाजिक कार्यकर्ते, गांधारी

.....

रस्त्यावरील मुरूम केव्हा हटविणार?

कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतर तरी मोहजाबंदी, चिचांबाभर, गांधारी, वढव येथील रस्त्यावरील टाकलेला मुरूम हटविणे आवश्यक आहे. याकडे संबंधित ग्रामपंचायत तसेच तालुका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.