शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

मावळ्यांच्या रक्तातून उभे राहिलेले स्वराज्य औरंगजेबही जिंकू शकला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:19 IST

मालेगाव : छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्मांतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले व त्यांना 'मावळे' हे सर्वसमावेशक नाव ...

मालेगाव : छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्मांतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले व त्यांना 'मावळे' हे सर्वसमावेशक नाव दिले. याच मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून स्वराज्याची पताका अभिमानाने फडकवली. मावळ्यांच्या रक्तातून उभे राहिलेले हे स्वराज्य प्रचंड महत्त्वाकांक्षा व लाखो सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूलासुद्धा जिंकता आले नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. भरत आव्हाळे यांनी मालेगाव येथे शिवजयंतीनिमित्त व्यक्त केले.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने व मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांची वजयंती कोरोना संबंधीचे नियम पाळून मालेगाव येथील नगरपंचायत सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी साध्या पद्धतीने ही शिवजयंती शिवप्रेमींनी साजरी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंतराव अवचार हे होते . तसेच नगर पंचायतचे सीईओ डॉ. विकास खंडारे, गोपाल पाटील राऊत, प्रा अनंत गायकवाड, प्रा. आनंद देवळे, अनिल गवळी, कल्पना कढणे, गीता रंजवे, यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ व शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विकास खंडारे, प्रशांत वाझुळकर, श्रीराम अवचार, जगन्नाथ रंजवे, प्रा. राजाराम वामन, प्रवीण पाटील, अनिल वाघ, प्रा विजय भोयर, जगदीश भालेराव, सतीश कुटे, प्रशांत डहाळे , संध्या आव्हाळे, कामिनी अवचार आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकमाचे संचालन नागेश कव्हर यांनी प्रास्ताविक मनोज वाझुळकर यांनी तर आभार प्रदर्शन भागवत मापारी यांनी केले .