शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

दहावीच्या परीक्षेतही मुलीच टाॅपर; जिल्हा विभागात ठरला अव्वल! ९७ शाळांचा निकाल १०० टक्के

By सुनील काकडे | Updated: June 2, 2023 15:36 IST

रिसोड जिल्ह्यात सर्वाधिक पुढे

वाशिम : यंदा २५ मे रोजी १२वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांच्या तुलनेत अधिक राहिली. शुक्रवार, २ जून रोजी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालातही तेच चित्र कायम राहत मुलींनी अग्रक्रम प्राप्त केला आहे. विशेष बाब म्हणजे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या यादीत गतवर्षीप्रमाणे यंदाही वाशिमने प्रथम क्रमांकावर येण्याचा बहुमान प्राप्त केला. ९७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला, हे विशेष.

वाशिम जिल्ह्यातील ३३० शाळांमधील १० हजार ६६३ मुले आणि ८ हजार ५१३ मुली असे एकंदरित १९ हजार १७६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १० हजार ५३९ मुले आणि ८ हजार ४२७ मुलींनी परीक्षा दिली. त्यातून ९ हजार ९१० मुले आणि ८१४४ मुली असे एकूण १८ हजार ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.०३ टक्के असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.६४ इतकी आहे.

दरम्यान, अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांच्या तुलनेत वाशिमने पहिल्या क्रमांकाचा ९५.१९ टक्के निकाल दिला आहे. ३३० शाळांपैकी ९७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या ५३ ने घटली आहे. याशिवाय एकूण निकालातही गतवर्षीच्या तुलनेत २.४३ टक्क्यांची घट झाली आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९२.६२ टक्के लागला होता; तर यंदाचा निकाल ९५.१९ टक्के इतका आहे.वाशिम तिसऱ्या; तर रिसोड पहिल्या क्रमांकावर

दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या तुलनेत बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही रिसोड तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी हा मान वाशिम तालुक्याला मिळाला होता. यंदा मात्र वाशिम तालुका तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.शिक्षणाचे माहेरघर सहाव्या क्रमांकावर

जिल्ह्यात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणारा कारंजा तालुका बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालातही सहाव्या क्रमांकावर फेकला गेला. अन्य पाच तालुक्यांच्या तुलनेत कारंजाने ९३.२८ टक्के निकाल दिला असून या तालुक्यातील १६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.