शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

दहावीच्या परीक्षेतही मुलीच टाॅपर; जिल्हा विभागात ठरला अव्वल! ९७ शाळांचा निकाल १०० टक्के

By सुनील काकडे | Updated: June 2, 2023 15:36 IST

रिसोड जिल्ह्यात सर्वाधिक पुढे

वाशिम : यंदा २५ मे रोजी १२वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांच्या तुलनेत अधिक राहिली. शुक्रवार, २ जून रोजी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालातही तेच चित्र कायम राहत मुलींनी अग्रक्रम प्राप्त केला आहे. विशेष बाब म्हणजे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या यादीत गतवर्षीप्रमाणे यंदाही वाशिमने प्रथम क्रमांकावर येण्याचा बहुमान प्राप्त केला. ९७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला, हे विशेष.

वाशिम जिल्ह्यातील ३३० शाळांमधील १० हजार ६६३ मुले आणि ८ हजार ५१३ मुली असे एकंदरित १९ हजार १७६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १० हजार ५३९ मुले आणि ८ हजार ४२७ मुलींनी परीक्षा दिली. त्यातून ९ हजार ९१० मुले आणि ८१४४ मुली असे एकूण १८ हजार ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.०३ टक्के असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.६४ इतकी आहे.

दरम्यान, अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांच्या तुलनेत वाशिमने पहिल्या क्रमांकाचा ९५.१९ टक्के निकाल दिला आहे. ३३० शाळांपैकी ९७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या ५३ ने घटली आहे. याशिवाय एकूण निकालातही गतवर्षीच्या तुलनेत २.४३ टक्क्यांची घट झाली आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९२.६२ टक्के लागला होता; तर यंदाचा निकाल ९५.१९ टक्के इतका आहे.वाशिम तिसऱ्या; तर रिसोड पहिल्या क्रमांकावर

दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या तुलनेत बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही रिसोड तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी हा मान वाशिम तालुक्याला मिळाला होता. यंदा मात्र वाशिम तालुका तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.शिक्षणाचे माहेरघर सहाव्या क्रमांकावर

जिल्ह्यात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणारा कारंजा तालुका बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालातही सहाव्या क्रमांकावर फेकला गेला. अन्य पाच तालुक्यांच्या तुलनेत कारंजाने ९३.२८ टक्के निकाल दिला असून या तालुक्यातील १६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.