शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवस उलटूनही पीक नुकसानीचे पंचनामे अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:41 IST

राज्यातील बहुतांश भागांत १९ ते २१ मार्च आणि २२ ते २३ मार्चदरम्यानच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस ...

राज्यातील बहुतांश भागांत १९ ते २१ मार्च आणि २२ ते २३ मार्चदरम्यानच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला. लाखो हेक्टर क्षेत्रातील रबी पिकांसह भाजीपाला आणि फळपिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. त्यात वाशिम जिल्ह्यात २७ महसूल मंडळातील १६९ गावांतील गहू, हरभरा या रबी पिकांसह भाजीपाला पिके, तसेच टरबूज, खरबूज, पपई, संत्रा, लिंबू आदी फळपिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला असून, तसा प्राथमिक अहवालही शासनाकडे पाठविला आहे. तथापि, १० दिवस उलटले तरी तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर अंतिम अहवालच सादर करण्यात आला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अंतिम अहवाल सादर होणार केव्हा आणि शेतकऱ्यांना मदत मिळणार केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-------------

नुकसानीचे ३० टक्के पंचनामे प्रलंबित

जिल्ह्यात ६८८० हेक्टर क्षेत्रातील रबी पिके, भाजीपाला पिके आणि फळपिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे; परंतु ३० मार्चपर्यंतही यापैकी केवळ ७० टक्के क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले असून, उर्वरित ३० टक्के क्षेत्रातील पंचनामेच झाले नसल्याने तालुकास्तरावरून अंतिम अहवालच प्राप्त होऊ शकला नाही.

--------------------

कोट : मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने २७ महसूल मंडळांतील १६९ गावांतील ६८८० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचा प्राथमिक अहवाल शासनस्तरावर पाठविला आहे. काही भागातील पंचनामे अद्याप झाले नाहीत. आज तालुकास्तरावरून अहवाल मागवून शासनाकडे निधीची मागणी नोंदवू.

-शैलेश हिंगे,

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

-------------

प्राथमिक अंदाजानुसार बाधित क्षेत्र

गावे - १६९

महसूल मंडळे - २७

बाधित क्षेत्र - ६८८० हेक्टर

--------------------

या पिकांना बसला फटका

भाजीपाला,

गहू,

टरबूज,

खरबूज,

काकडी,