शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

रिसोड तालुक्यात ग्राम कृषी विकास समितीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST

रिसोड तालुक्यात मंगळवार, ९ मार्चपासून ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कृषी सहायक ईरेश ...

रिसोड तालुक्यात मंगळवार, ९ मार्चपासून ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कृषी सहायक ईरेश कचकलवार यांनी तालुक्यातील वाकदवाडी, वाकद, वडजी या गावांत ग्राम कृषी विकास समितीची स्थापना केली आहे.

स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य, शेतकरी गटांचे प्रतिनिधी, महिला बचत गटाचे प्रतिनिधी, कृषिपूरक व्यावसायिक, शेतकरी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांचा समावेश आहे. समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सरपंच आहेत. स्थापन करण्यात आलेल्या समित्या शेतकऱ्यांच्या सर्वच समस्येच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. शेती हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था शेतीवर निगडित आहे. हवामानातील बदल, लहरी पर्जन्यमान, कीड व रोग, शेतमालाच्या दरामध्ये अचानक होणारी घसरण, आदी बाबींचा विचार करून शेतीमधून शाश्वत उत्पन्न मिळेल याकरिता राज्यातील कृषी विभागाने ग्रामपातळीवर विचारविनिमय करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता ग्राम कृषी विकास समितीची स्थापना केली आहे. ग्राम कृषी विकास समितीची स्थापन गावोगावी करण्याकरिता जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक गावोगावी ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करीत आहेत.