शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

उद्योजकांना कुशल मनुष्यबळ अन्‌ कामगारांना काम मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:42 IST

वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र चिंतेचे व अस्थिरतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध ...

वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र चिंतेचे व अस्थिरतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असल्याने याचा फटका उद्योग, व्यापार क्षेत्राला बसत आहे. उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ, कच्चा मालाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे काहीचे मंदीचे सावट आहे.

औद्योगिक, व्यापार आदी क्षेत्रात वाशिम जिल्हा अगोदरच मागासलेला म्हणून ओळखला जातो. वाशिम शहरानजीकच्या एमआयडीसी क्षेत्राचा अपवाद वगळता जिल्ह्यात उर्वरित ठिकाणच्या एमआयडीसीला विकासाचीच प्रतीक्षा आहे. वाशिम येथील एमआयडीसीमध्ये २० ते २५ छोट्या, मोठ्या उद्योगाचा अपवाद वगळता अन्य मोठे उद्योग सुरू होऊ शकले नाहीत. कारंजा येथे सूतगिरणी व दाल उद्योग आहे. रिसोड येथे एका सूतगिरणीचा अपवाद वगळता उर्वरित मोठा उद्योग नाही. अमानी येथील एमआयडीसी क्षेत्रात तीन, चार उद्योगाचा अपवाद वगळता अन्य उद्योग सुरू झाले नाहीत. त्यातच गतवर्षी साधारण मार्चपासून उद्योगांना मोठ्या प्रमाणात विविध संकटांना सामोरे जावे लागले आहे. यंदा दुसऱ्या लाटेमध्येदेखील जनजीवन प्रभावित झाले असून, उद्योगधंदेही ठप्प झाले. जिल्ह्यात सध्या कडक निर्बंध असल्याने उद्योगधंदेही बंद आहेत. कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. परप्रांतीय कामगार गावी निघून गेले आहेत, तर स्थानिक कामगारही भीतीपोटी येण्याचे टाळत आहेत. दुसरीकडे अकुशल कामगार कामांच्या मागणीसाठी येतात; परंतु कुशल कामगारांची गरज असल्यामुळे अकुशल कामगारांना स्वीकारले जात आहे. या सर्व अडचणींमुळे उद्योगांची गती मंदावली असून, बाजारपेठा बंद असल्यामुळे उद्योजक अडचणीत आले आहेत.

चौकट....

कच्चा मालाची भाववाढ उद्योगांच्या मुळावर

कच्चा मालाच्या अडचणीला व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. जवळपास २० ते ३० टक्क्यांपर्यंत कच्चा मालाचे भाव वाढले आहेत. अगोदर हा माल उद्योगांना उधारीवर मिळत होता; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अस्थिरता असल्यामुळे आता उधारीवर कच्चा माल दिला जात नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या दिवसांत अर्थचक्र थांबल्यामुळे उद्योगांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

उद्योजकांच्या प्रतिक्रिया ..

कच्चा मालाचे भाव वधारले

अलीकडे कच्चा मालाच्या भावात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे अर्थसाखळी विस्कळीत झाली आहे. सध्याच्या काळात पहिल्यासारखे कोणी उधारीवर कच्चा माल देत नाही. त्यामुळे अडचणीवर मात करून उद्योग सुरू ठेवावा लागतो.

- आनंद चरखा, उद्योजक.

००

कुशल मनुष्यबळाची टंचाई

सध्या कुशल मनुष्यबळाची मोठी अडचण असून, कडक निर्बंधामुळे उद्योगक्षेत्रही प्रभावित झाले आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे उत्पादन सुरू ठेवूनही उपयोग होत नाही. त्यामुळे काही प्रमाणात व्यापाराला सूट मिळणे अपेक्षित आहे.

- विशाल मालपाणी, उद्योजक.

००००

उद्योगाला उतरती कळा

कोरोनामुळे उद्योग क्षेत्राला जणू उतरती कळा लागत आहे. पहिल्या लाटेतून सावरत नाही, तेच कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कडक निर्बंध लागू आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय परजिल्ह्यात जाता येत नाही. उद्योगक्षेत्राला उभारी मिळणे गरजेचे आहे.

- पंजाबराव अवचार,उद्योजक.

०००

कामगारांच्या प्रतिक्रिया..................

उद्योगधंदे सुरू केव्हा होतील?

कोरोनामुळे कामगारांवर वाईट दिवस आले आहेत. उद्योगक्षेत्र प्रभावित झाल्याने त्याचा फटका कामगारांनादेखील बसत आहे. परप्रांतीय मजूर घराकडे परतत आहेत तर स्थानिक कामगारांना रोजगार मिळत नाही. शासनाने कामगारांसाठी एखादे पॅकेज जाहीर करणे आवश्यक ठरत आहे. काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न आहे.

-आनंद कोल्हे, कामगार.

उपासमारीची वेळ आली

कोरोनामुळे अलीकडे कामगार कमी केले जात आहेत. यामुळे वेतनही कमी होते. त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकावा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काम करण्याची तयारी असलेले अनेक नवखे कामगार कामाच्या मागणीसाठी येतात; पण पूर्वीचेच कामगार कमी केले असल्यामुळे त्यांना काम दिले जात नाही.

- योगेश हिंगळकर, कामगार.