शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उद्योजकांना कुशल मनुष्यबळ अन्‌ कामगारांना काम मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:42 IST

वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र चिंतेचे व अस्थिरतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध ...

वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र चिंतेचे व अस्थिरतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असल्याने याचा फटका उद्योग, व्यापार क्षेत्राला बसत आहे. उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ, कच्चा मालाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे काहीचे मंदीचे सावट आहे.

औद्योगिक, व्यापार आदी क्षेत्रात वाशिम जिल्हा अगोदरच मागासलेला म्हणून ओळखला जातो. वाशिम शहरानजीकच्या एमआयडीसी क्षेत्राचा अपवाद वगळता जिल्ह्यात उर्वरित ठिकाणच्या एमआयडीसीला विकासाचीच प्रतीक्षा आहे. वाशिम येथील एमआयडीसीमध्ये २० ते २५ छोट्या, मोठ्या उद्योगाचा अपवाद वगळता अन्य मोठे उद्योग सुरू होऊ शकले नाहीत. कारंजा येथे सूतगिरणी व दाल उद्योग आहे. रिसोड येथे एका सूतगिरणीचा अपवाद वगळता उर्वरित मोठा उद्योग नाही. अमानी येथील एमआयडीसी क्षेत्रात तीन, चार उद्योगाचा अपवाद वगळता अन्य उद्योग सुरू झाले नाहीत. त्यातच गतवर्षी साधारण मार्चपासून उद्योगांना मोठ्या प्रमाणात विविध संकटांना सामोरे जावे लागले आहे. यंदा दुसऱ्या लाटेमध्येदेखील जनजीवन प्रभावित झाले असून, उद्योगधंदेही ठप्प झाले. जिल्ह्यात सध्या कडक निर्बंध असल्याने उद्योगधंदेही बंद आहेत. कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. परप्रांतीय कामगार गावी निघून गेले आहेत, तर स्थानिक कामगारही भीतीपोटी येण्याचे टाळत आहेत. दुसरीकडे अकुशल कामगार कामांच्या मागणीसाठी येतात; परंतु कुशल कामगारांची गरज असल्यामुळे अकुशल कामगारांना स्वीकारले जात आहे. या सर्व अडचणींमुळे उद्योगांची गती मंदावली असून, बाजारपेठा बंद असल्यामुळे उद्योजक अडचणीत आले आहेत.

चौकट....

कच्चा मालाची भाववाढ उद्योगांच्या मुळावर

कच्चा मालाच्या अडचणीला व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. जवळपास २० ते ३० टक्क्यांपर्यंत कच्चा मालाचे भाव वाढले आहेत. अगोदर हा माल उद्योगांना उधारीवर मिळत होता; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अस्थिरता असल्यामुळे आता उधारीवर कच्चा माल दिला जात नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या दिवसांत अर्थचक्र थांबल्यामुळे उद्योगांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

उद्योजकांच्या प्रतिक्रिया ..

कच्चा मालाचे भाव वधारले

अलीकडे कच्चा मालाच्या भावात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे अर्थसाखळी विस्कळीत झाली आहे. सध्याच्या काळात पहिल्यासारखे कोणी उधारीवर कच्चा माल देत नाही. त्यामुळे अडचणीवर मात करून उद्योग सुरू ठेवावा लागतो.

- आनंद चरखा, उद्योजक.

००

कुशल मनुष्यबळाची टंचाई

सध्या कुशल मनुष्यबळाची मोठी अडचण असून, कडक निर्बंधामुळे उद्योगक्षेत्रही प्रभावित झाले आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे उत्पादन सुरू ठेवूनही उपयोग होत नाही. त्यामुळे काही प्रमाणात व्यापाराला सूट मिळणे अपेक्षित आहे.

- विशाल मालपाणी, उद्योजक.

००००

उद्योगाला उतरती कळा

कोरोनामुळे उद्योग क्षेत्राला जणू उतरती कळा लागत आहे. पहिल्या लाटेतून सावरत नाही, तेच कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कडक निर्बंध लागू आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय परजिल्ह्यात जाता येत नाही. उद्योगक्षेत्राला उभारी मिळणे गरजेचे आहे.

- पंजाबराव अवचार,उद्योजक.

०००

कामगारांच्या प्रतिक्रिया..................

उद्योगधंदे सुरू केव्हा होतील?

कोरोनामुळे कामगारांवर वाईट दिवस आले आहेत. उद्योगक्षेत्र प्रभावित झाल्याने त्याचा फटका कामगारांनादेखील बसत आहे. परप्रांतीय मजूर घराकडे परतत आहेत तर स्थानिक कामगारांना रोजगार मिळत नाही. शासनाने कामगारांसाठी एखादे पॅकेज जाहीर करणे आवश्यक ठरत आहे. काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न आहे.

-आनंद कोल्हे, कामगार.

उपासमारीची वेळ आली

कोरोनामुळे अलीकडे कामगार कमी केले जात आहेत. यामुळे वेतनही कमी होते. त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकावा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काम करण्याची तयारी असलेले अनेक नवखे कामगार कामाच्या मागणीसाठी येतात; पण पूर्वीचेच कामगार कमी केले असल्यामुळे त्यांना काम दिले जात नाही.

- योगेश हिंगळकर, कामगार.