शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

महिला सक्षम व्हाव्यात; मात्र पुरुषी नकोत

By admin | Updated: September 30, 2014 01:31 IST

अपर्णा रामतीर्थकर यांचे परखड मत.

वाशिम : महिलांनी विकास करायलाच हवा, शिक्षणही घ्यायला हवे. महिला सक्षम व्हायला हव्यात; मात्र त्यांनी पुरुषांसारखे वागू नये, त्या पुरुषी व्हायला नकोत, असे परखड मत ह्यलेक वाचवाह्ण आंदोलनाच्या प्रणेत्या अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले.येथील रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात व्याख्यान देण्याकरिता अपर्णा रामतीर्थकर आल्या होत्या. त्यानिमित्त वीरेंद्र वाटाणे यांच्या निवासस्थानी रामतीर्थकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी महिलांचा विकास आणि भारतीय संस्कृतीचा र्‍हास यामध्ये होत असलेला समज व गैरसमज यावर प्रकाश टाकला.प्रश्न : महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा का हाती घेतला? उत्तर : मी पूर्वी कुटुंब सल्ला केंद्र चालवित होते. हे केंद्र चालवित असताना मी अनेक घटस्फोटाची प्रकरणे पाहिली. पुरुषांसोबतच महिलाही संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत असल्याचे माझ्या लक्षात आले. महिला आपले कर्तव्य विसरल्या आहेत. ही बाब आपण लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आपण बाहेर निघायला हवे, असे मला वाटले त्यानंतर मी महिलांना जागृत करण्याचे काम सुरू केले. प्रश्न: देशातील कुटुंब व्यवस्था संपुष्टात येत आहे, असे वाटते का? उत्तर : होय, आपल्या संस्कृतीत पूर्वी कुटुंब व्यवस्थेला महत्त्व होते. एकाच कुटुंबात सर्व भाऊ, आई-वडील राहत होते. आता मात्र हे सर्व संपुष्टात येत आहे. एकत्र कुटुंबांचे महत्त्व शब्दबद्ध करणे अशक्यच आहे.प्रश्न: महिलांनी शिक्षण घ्यायला नको, असे तुम्हाला वाटते का? उत्तर : महिलांनी शिक्षण घ्यायलाच हवे. उच्च शिक्षणही घ्यायला हवे; मात्र सध्याच्या महिला आ त्मसन्मानासाठी भांडत आहेत. माझीही दखल घेतली जावी, असे त्यांना वाटते. हे योग्यही आहे. हे करीत असताना आपला पती, वडील यांचाही सन्मान राखणे गरजेचे आहे. अडाणी महिलाही घर व संसार चांगल्याप्रकारे चालवू शकते. माझी आजी अडाणी होती; मात्र ती ८0 जणांचे कुटुंब सांभाळी त होती. त्यामुळे सुशिक्षित महिलाच संसार चांगल्याप्रकारे सांभाळू शकतात, हा समज चुकीचा आहे. प्रश्न: महिलांनी नोकरी करू नये, असे तुम्हाला वाटते काय?उत्तर: महिलांची घरची परिस्थिती चांगली असेल तर महिलांनी नोकरी करू नये तर त्यांनी संसार सांभाळावा, घरात पैशांची अडचण असेल तर मग नोकरी करावी. प्रश्न : लव्ह जिहादवर तुम्ही बरीच टीका करता? उत्तर : सध्या हिंदूंच्या मुलींचे धर्मांतर करण्याचा सपाटा सुरू आहे. हा प्रकार मोठय़ा प्रमाणात सुरू असून, आपले त्याकडे लक्ष नाही. ही गंभीर बाब आहे.