शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षम व्हाव्यात; मात्र पुरुषी नकोत

By admin | Updated: September 30, 2014 01:31 IST

अपर्णा रामतीर्थकर यांचे परखड मत.

वाशिम : महिलांनी विकास करायलाच हवा, शिक्षणही घ्यायला हवे. महिला सक्षम व्हायला हव्यात; मात्र त्यांनी पुरुषांसारखे वागू नये, त्या पुरुषी व्हायला नकोत, असे परखड मत ह्यलेक वाचवाह्ण आंदोलनाच्या प्रणेत्या अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले.येथील रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात व्याख्यान देण्याकरिता अपर्णा रामतीर्थकर आल्या होत्या. त्यानिमित्त वीरेंद्र वाटाणे यांच्या निवासस्थानी रामतीर्थकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी महिलांचा विकास आणि भारतीय संस्कृतीचा र्‍हास यामध्ये होत असलेला समज व गैरसमज यावर प्रकाश टाकला.प्रश्न : महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा का हाती घेतला? उत्तर : मी पूर्वी कुटुंब सल्ला केंद्र चालवित होते. हे केंद्र चालवित असताना मी अनेक घटस्फोटाची प्रकरणे पाहिली. पुरुषांसोबतच महिलाही संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत असल्याचे माझ्या लक्षात आले. महिला आपले कर्तव्य विसरल्या आहेत. ही बाब आपण लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आपण बाहेर निघायला हवे, असे मला वाटले त्यानंतर मी महिलांना जागृत करण्याचे काम सुरू केले. प्रश्न: देशातील कुटुंब व्यवस्था संपुष्टात येत आहे, असे वाटते का? उत्तर : होय, आपल्या संस्कृतीत पूर्वी कुटुंब व्यवस्थेला महत्त्व होते. एकाच कुटुंबात सर्व भाऊ, आई-वडील राहत होते. आता मात्र हे सर्व संपुष्टात येत आहे. एकत्र कुटुंबांचे महत्त्व शब्दबद्ध करणे अशक्यच आहे.प्रश्न: महिलांनी शिक्षण घ्यायला नको, असे तुम्हाला वाटते का? उत्तर : महिलांनी शिक्षण घ्यायलाच हवे. उच्च शिक्षणही घ्यायला हवे; मात्र सध्याच्या महिला आ त्मसन्मानासाठी भांडत आहेत. माझीही दखल घेतली जावी, असे त्यांना वाटते. हे योग्यही आहे. हे करीत असताना आपला पती, वडील यांचाही सन्मान राखणे गरजेचे आहे. अडाणी महिलाही घर व संसार चांगल्याप्रकारे चालवू शकते. माझी आजी अडाणी होती; मात्र ती ८0 जणांचे कुटुंब सांभाळी त होती. त्यामुळे सुशिक्षित महिलाच संसार चांगल्याप्रकारे सांभाळू शकतात, हा समज चुकीचा आहे. प्रश्न: महिलांनी नोकरी करू नये, असे तुम्हाला वाटते काय?उत्तर: महिलांची घरची परिस्थिती चांगली असेल तर महिलांनी नोकरी करू नये तर त्यांनी संसार सांभाळावा, घरात पैशांची अडचण असेल तर मग नोकरी करावी. प्रश्न : लव्ह जिहादवर तुम्ही बरीच टीका करता? उत्तर : सध्या हिंदूंच्या मुलींचे धर्मांतर करण्याचा सपाटा सुरू आहे. हा प्रकार मोठय़ा प्रमाणात सुरू असून, आपले त्याकडे लक्ष नाही. ही गंभीर बाब आहे.