शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पेरणीत विजेचा गतिरोध

By admin | Updated: October 26, 2015 01:53 IST

वाशिम जिल्ह्यातील अनेक विद्युत रोहित्र नादुरूस्त; रब्बीची पेरणी प्रभावित, शेतकरी भयभीत.

वाशिम: एकामागून एक कोसळणार्‍या नैसर्गिक व मानवी संकटातून स्वत:ला सावरत असलेला बळीराजा रब्बी पेरणीपूर्वी विद्युत पुरवठय़ाच्या समस्येने हैराण झाल्याचे दिसून येते. गावठाण फिडर आणि विद्युत रोहित्रांच्या समस्येमुळे रब्बीची पेरणी प्रभावित झाली आहे. खरीप हंगामात निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्हय़ातील शेतकरी पुरता खचून गेला. कर्जाची परतफेड होईल, इतपतही उत्पादन हाती आले नसल्याने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. ऐन हंगामात शेतमालाचे बाजारभाव पडतात, याचा प्रत्यय यावर्षी शेतकर्‍यांना येत आहे. एरवी पाच हजारांच्या आसपास राहणारा सोयाबीनचा बाजारभाव आता ३३00 ते ३७00 या दरम्यान स्थिरावला असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संकटात अधिकच भर पडली आहे. खरिपाची कसर भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी पेरणीवर पूर्णपणे विसंबून आहे. सिंचनाची सुविधा असणार्‍या शेतकर्‍यांकडे पाणी उपलब्ध आहे; मात्र पुरेशा प्रमाणात वीज नसल्याने शे तकरी धास्तावले असल्याचे दिसून येते. याचा विपरित परिणाम रब्बीच्या पेरणीवर होत असल्याचे दिसून येते. रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. आतापर्यंत सात टक्क्यावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी आहे. जिल्हय़ात १७0 ते १९0 च्या आसपास विद्युत रोहित्र जळाले आहेत. त्या तुलनेत विद्युत रोहित्रांची उपलब्धता कमी असल्याने शेतकर्‍यांना वीजपुरवठा मिळेनासा झाला आहे. ३५ ते ४0 ठिकाणच्या गावठाण फिडरमध्येही तांत्रिक बिघाड आल्याने वीज पुरवठा ठप्प असल्याची माहिती आहे.