शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

रब्बी पेरणीत विजेचा गतिरोध

By admin | Updated: October 26, 2015 01:53 IST

वाशिम जिल्ह्यातील अनेक विद्युत रोहित्र नादुरूस्त; रब्बीची पेरणी प्रभावित, शेतकरी भयभीत.

वाशिम: एकामागून एक कोसळणार्‍या नैसर्गिक व मानवी संकटातून स्वत:ला सावरत असलेला बळीराजा रब्बी पेरणीपूर्वी विद्युत पुरवठय़ाच्या समस्येने हैराण झाल्याचे दिसून येते. गावठाण फिडर आणि विद्युत रोहित्रांच्या समस्येमुळे रब्बीची पेरणी प्रभावित झाली आहे. खरीप हंगामात निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्हय़ातील शेतकरी पुरता खचून गेला. कर्जाची परतफेड होईल, इतपतही उत्पादन हाती आले नसल्याने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. ऐन हंगामात शेतमालाचे बाजारभाव पडतात, याचा प्रत्यय यावर्षी शेतकर्‍यांना येत आहे. एरवी पाच हजारांच्या आसपास राहणारा सोयाबीनचा बाजारभाव आता ३३00 ते ३७00 या दरम्यान स्थिरावला असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संकटात अधिकच भर पडली आहे. खरिपाची कसर भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी पेरणीवर पूर्णपणे विसंबून आहे. सिंचनाची सुविधा असणार्‍या शेतकर्‍यांकडे पाणी उपलब्ध आहे; मात्र पुरेशा प्रमाणात वीज नसल्याने शे तकरी धास्तावले असल्याचे दिसून येते. याचा विपरित परिणाम रब्बीच्या पेरणीवर होत असल्याचे दिसून येते. रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. आतापर्यंत सात टक्क्यावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी आहे. जिल्हय़ात १७0 ते १९0 च्या आसपास विद्युत रोहित्र जळाले आहेत. त्या तुलनेत विद्युत रोहित्रांची उपलब्धता कमी असल्याने शेतकर्‍यांना वीजपुरवठा मिळेनासा झाला आहे. ३५ ते ४0 ठिकाणच्या गावठाण फिडरमध्येही तांत्रिक बिघाड आल्याने वीज पुरवठा ठप्प असल्याची माहिती आहे.