शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

रब्बी पेरणीत विजेचा गतिरोध

By admin | Updated: October 26, 2015 01:53 IST

वाशिम जिल्ह्यातील अनेक विद्युत रोहित्र नादुरूस्त; रब्बीची पेरणी प्रभावित, शेतकरी भयभीत.

वाशिम: एकामागून एक कोसळणार्‍या नैसर्गिक व मानवी संकटातून स्वत:ला सावरत असलेला बळीराजा रब्बी पेरणीपूर्वी विद्युत पुरवठय़ाच्या समस्येने हैराण झाल्याचे दिसून येते. गावठाण फिडर आणि विद्युत रोहित्रांच्या समस्येमुळे रब्बीची पेरणी प्रभावित झाली आहे. खरीप हंगामात निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्हय़ातील शेतकरी पुरता खचून गेला. कर्जाची परतफेड होईल, इतपतही उत्पादन हाती आले नसल्याने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. ऐन हंगामात शेतमालाचे बाजारभाव पडतात, याचा प्रत्यय यावर्षी शेतकर्‍यांना येत आहे. एरवी पाच हजारांच्या आसपास राहणारा सोयाबीनचा बाजारभाव आता ३३00 ते ३७00 या दरम्यान स्थिरावला असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संकटात अधिकच भर पडली आहे. खरिपाची कसर भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी पेरणीवर पूर्णपणे विसंबून आहे. सिंचनाची सुविधा असणार्‍या शेतकर्‍यांकडे पाणी उपलब्ध आहे; मात्र पुरेशा प्रमाणात वीज नसल्याने शे तकरी धास्तावले असल्याचे दिसून येते. याचा विपरित परिणाम रब्बीच्या पेरणीवर होत असल्याचे दिसून येते. रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. आतापर्यंत सात टक्क्यावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी आहे. जिल्हय़ात १७0 ते १९0 च्या आसपास विद्युत रोहित्र जळाले आहेत. त्या तुलनेत विद्युत रोहित्रांची उपलब्धता कमी असल्याने शेतकर्‍यांना वीजपुरवठा मिळेनासा झाला आहे. ३५ ते ४0 ठिकाणच्या गावठाण फिडरमध्येही तांत्रिक बिघाड आल्याने वीज पुरवठा ठप्प असल्याची माहिती आहे.