शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

रब्बी पेरणीत विजेचा गतिरोध

By admin | Updated: October 26, 2015 01:53 IST

वाशिम जिल्ह्यातील अनेक विद्युत रोहित्र नादुरूस्त; रब्बीची पेरणी प्रभावित, शेतकरी भयभीत.

वाशिम: एकामागून एक कोसळणार्‍या नैसर्गिक व मानवी संकटातून स्वत:ला सावरत असलेला बळीराजा रब्बी पेरणीपूर्वी विद्युत पुरवठय़ाच्या समस्येने हैराण झाल्याचे दिसून येते. गावठाण फिडर आणि विद्युत रोहित्रांच्या समस्येमुळे रब्बीची पेरणी प्रभावित झाली आहे. खरीप हंगामात निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्हय़ातील शेतकरी पुरता खचून गेला. कर्जाची परतफेड होईल, इतपतही उत्पादन हाती आले नसल्याने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. ऐन हंगामात शेतमालाचे बाजारभाव पडतात, याचा प्रत्यय यावर्षी शेतकर्‍यांना येत आहे. एरवी पाच हजारांच्या आसपास राहणारा सोयाबीनचा बाजारभाव आता ३३00 ते ३७00 या दरम्यान स्थिरावला असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संकटात अधिकच भर पडली आहे. खरिपाची कसर भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी पेरणीवर पूर्णपणे विसंबून आहे. सिंचनाची सुविधा असणार्‍या शेतकर्‍यांकडे पाणी उपलब्ध आहे; मात्र पुरेशा प्रमाणात वीज नसल्याने शे तकरी धास्तावले असल्याचे दिसून येते. याचा विपरित परिणाम रब्बीच्या पेरणीवर होत असल्याचे दिसून येते. रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. आतापर्यंत सात टक्क्यावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी आहे. जिल्हय़ात १७0 ते १९0 च्या आसपास विद्युत रोहित्र जळाले आहेत. त्या तुलनेत विद्युत रोहित्रांची उपलब्धता कमी असल्याने शेतकर्‍यांना वीजपुरवठा मिळेनासा झाला आहे. ३५ ते ४0 ठिकाणच्या गावठाण फिडरमध्येही तांत्रिक बिघाड आल्याने वीज पुरवठा ठप्प असल्याची माहिती आहे.