शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात विजेचे भारनियमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:44 IST

वाशिम : पावसाच्या सरासरीमध्ये घट झाल्याने उद्भवलेली पाणीटंचाई आणि पावसाळ्याचे दिवस असतानाही तापत असलेल्या कडक उन्हामुळे विजेची मागणी अचानक वाढली आहे. परिणामी, विजेची गरज भरून काढण्यासाठी राज्यभरात ई, एफ आणि जी-१ ते जी-३ ग्रुपमध्ये प्रत्येकी सहा ते सात तासांचे वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळित  पाणीटंचाई, वाढत्या तापमानाचा परिणाम

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पावसाच्या सरासरीमध्ये घट झाल्याने उद्भवलेली पाणीटंचाई आणि पावसाळ्याचे दिवस असतानाही तापत असलेल्या कडक उन्हामुळे विजेची मागणी अचानक वाढली आहे. परिणामी, विजेची गरज भरून काढण्यासाठी राज्यभरात ई, एफ आणि जी-१ ते जी-३ ग्रुपमध्ये प्रत्येकी सहा ते सात तासांचे वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.राज्याला दैनंदिन किमान १७ ते १८ हजार मेगावॉट विजेची आवश्यकता भासते. ही गरज भागविण्यासाठी महावितरणच्या वतीने कोयना विद्युत निर्मिती केंद्रावर सर्वाधिक वीजनिर्मितीचा भार दिला जातो. याशिवाय विदर्भातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रावर महावितरणची दारोमदार असते. या दोन ठिकाणाहून किमान १0 ते १२ हजार मेगावॉट वीज दर दिवसाला उपलब्ध होत असते. उर्वरित ५ ते ६ हजार मेगावॉट वीज ही खासगी वीजनिर्मिती केंद्राकडून घेतली जाते. मात्र, सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असतानाही घटलेले पर्जन्यमान, दिवसेंदिवस अधिकच तापत असलेले ऊन आणि औष्णिक प्रकल्पांचे काही संच तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने विजेची मागणी आणि प्रत्यक्ष पुरवठा यात कमालीची तफावत निर्माण झालेली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने जी-१, जी-२, जी-३ ग्रुप या प्रकारात सात तासांचे आणि ‘एफ ग्रुप’मध्ये साधारणत: सव्वापाच तासांचे भारनियमन सुरू केले आहे. परिणामी, राज्यभरातील नागरिकांची तारांबळ उडत असून, लघू व्यवसाय संकटात सापडले आहेत. 

नापिकीचे संकटही झाले गडद!अमरावती विभागातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्वच ४४३ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ २६ टक्के जलसाठा शिल्लक असून, अधिकांश पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने खरिपातील पिके धोक्यात सापडली असताना ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची सोय आहे, त्यांना विजेअभावी पिकांना पाणी देणे अशक्य होत असल्याने यंदा नापिकीचे संकटही गडद झाले आहे. 

वीजपुरवठा कमी आणि मागणीमध्ये अचानक झालेली वाढ लक्षात घेऊन तातडीची उपाययोजना म्हणून राज्यभरात ई, एफ आणि जी या गटात विजेचे भारनियमन केले जात आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.- पी.एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण