शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

राज्यभरात विजेचे भारनियमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:44 IST

वाशिम : पावसाच्या सरासरीमध्ये घट झाल्याने उद्भवलेली पाणीटंचाई आणि पावसाळ्याचे दिवस असतानाही तापत असलेल्या कडक उन्हामुळे विजेची मागणी अचानक वाढली आहे. परिणामी, विजेची गरज भरून काढण्यासाठी राज्यभरात ई, एफ आणि जी-१ ते जी-३ ग्रुपमध्ये प्रत्येकी सहा ते सात तासांचे वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळित  पाणीटंचाई, वाढत्या तापमानाचा परिणाम

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पावसाच्या सरासरीमध्ये घट झाल्याने उद्भवलेली पाणीटंचाई आणि पावसाळ्याचे दिवस असतानाही तापत असलेल्या कडक उन्हामुळे विजेची मागणी अचानक वाढली आहे. परिणामी, विजेची गरज भरून काढण्यासाठी राज्यभरात ई, एफ आणि जी-१ ते जी-३ ग्रुपमध्ये प्रत्येकी सहा ते सात तासांचे वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.राज्याला दैनंदिन किमान १७ ते १८ हजार मेगावॉट विजेची आवश्यकता भासते. ही गरज भागविण्यासाठी महावितरणच्या वतीने कोयना विद्युत निर्मिती केंद्रावर सर्वाधिक वीजनिर्मितीचा भार दिला जातो. याशिवाय विदर्भातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रावर महावितरणची दारोमदार असते. या दोन ठिकाणाहून किमान १0 ते १२ हजार मेगावॉट वीज दर दिवसाला उपलब्ध होत असते. उर्वरित ५ ते ६ हजार मेगावॉट वीज ही खासगी वीजनिर्मिती केंद्राकडून घेतली जाते. मात्र, सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असतानाही घटलेले पर्जन्यमान, दिवसेंदिवस अधिकच तापत असलेले ऊन आणि औष्णिक प्रकल्पांचे काही संच तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने विजेची मागणी आणि प्रत्यक्ष पुरवठा यात कमालीची तफावत निर्माण झालेली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने जी-१, जी-२, जी-३ ग्रुप या प्रकारात सात तासांचे आणि ‘एफ ग्रुप’मध्ये साधारणत: सव्वापाच तासांचे भारनियमन सुरू केले आहे. परिणामी, राज्यभरातील नागरिकांची तारांबळ उडत असून, लघू व्यवसाय संकटात सापडले आहेत. 

नापिकीचे संकटही झाले गडद!अमरावती विभागातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्वच ४४३ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ २६ टक्के जलसाठा शिल्लक असून, अधिकांश पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने खरिपातील पिके धोक्यात सापडली असताना ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची सोय आहे, त्यांना विजेअभावी पिकांना पाणी देणे अशक्य होत असल्याने यंदा नापिकीचे संकटही गडद झाले आहे. 

वीजपुरवठा कमी आणि मागणीमध्ये अचानक झालेली वाढ लक्षात घेऊन तातडीची उपाययोजना म्हणून राज्यभरात ई, एफ आणि जी या गटात विजेचे भारनियमन केले जात आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.- पी.एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण