शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वाशिम जिल्ह्यातील महावितरणची रोहित्रे धोकादायक; कवाडे  राहतात सताड उघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 14:40 IST

रिसोड (वाशिम):  शहरी व ग्रामीण भागात वीजपुरवठा करण्यासाठी अनुक्रमे थ्री फेज व सिंगल फेज योजना कार्यान्वित आहेत. यामाध्यमातून वीजपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी रोहित्र बसविण्यात आले आहेत. मात्र, ते धोकादायक पद्धतीने सताड उघडेच राहत असल्याने अपघातांची शक्यता बळावली असून महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.  रिसोड तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात ...

ठळक मुद्देअपघातांची शक्यता बळावली लक्ष पुरविणे गरजेचे

रिसोड (वाशिम):  शहरी व ग्रामीण भागात वीजपुरवठा करण्यासाठी अनुक्रमे थ्री फेज व सिंगल फेज योजना कार्यान्वित आहेत. यामाध्यमातून वीजपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी रोहित्र बसविण्यात आले आहेत. मात्र, ते धोकादायक पद्धतीने सताड उघडेच राहत असल्याने अपघातांची शक्यता बळावली असून महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.  

रिसोड तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात विजपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी गावठाण आणि कृषी फिडर बसविण्यात आलेले आहेत. त्यातील अनेक रोहित्र रस्त्यालगत असून, त्यातून विजेचा पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी वितरण पेट्या लावण्यात येतात. या पेट्यांमध्ये असलेले उघडे फ्यूज तार धोकादायक असतात. त्यास स्पर्श झाल्यास प्राणहानी अटळ आहे. या पेट्या सहज हात लागेल किंवा स्पर्श होईल एवढ्याच अंतरावर खांबाला बसविलेल्या असतात.  या पेट्यांना जनावरांचा स्पर्श झाल्याने ती दगावल्याच्या घटनाही  यापूर्वी काहीठिकाणी घडल्या आहेत. याशिवाय रोहित्रातून विजपुरवठा खंडित झाल्याने अनेक शेतकरी या डिस्ट्रिब्यूशन बॉक्समधील फ्यूज स्वत:च दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात किंवा खासगी लाईनमनचा आधार घेतात. हा प्रकारही जीवघेणा ठरत असल्याने महावितरणने वेळीच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.