शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

सरपंच निवडणुकीने वातावरण तापले

By admin | Updated: August 22, 2015 01:17 IST

सरपंचपदाला अर्थकारणाची झालर ; सहा टप्प्यात निवडणुका.

वाशिम : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी क्षमली असली तरी सरपंचपदाच्या निवडीसाठी राजकारण तापले आहे. १६३ ग्रामपंचायतीमधील सरपंच निवडणुकीची प्रक्रिया जिल्ह्यात सहा टप्प्यात पूर्ण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १९ आॅगस्ट रोजी रिसोड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक झाली आहे. आता २३ ते ३० आॅगस्ट दरम्यान उर्वरित १६१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची जिल्ह्यात निवडणूक होत आहे.१४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना येत्या काळात मिळणार असल्याने सरपंचपदाला नेहमीच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक महत्त्व आले आहे. दुसरीकडे तालुकानिहाय सरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतींची मुदत संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.सरपंचपदाच्या निवडीसाठी विजयी सदस्यांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यात पुढील काळात २३, २६, २८, २९ आणि ३० आॅगस्ट अशा पाच टप्प्यात सरपंचपदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सदस्यांची जुळवाजुळव करण्यासोबतच ग्राम पातळीवर राजकारण तापले आहे.दुसरीकडे आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा २३ जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाने केली होती. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायती अविरोध झाल्या होत्या. त्यामुळे १५४ ग्रामपंचायतींच्या १२८१ सदस्यांसाठी प्रत्यक्षात ही निवडणूक झाली होती. त्यापूर्वी २४४ सदस्यांची अविरोध निवड झाल्याने प्रत्यक्षात १५२५ पैकी १२८१ सदस्यांच्या निवडीसाठी ही निवडणूक झाली होती. चार आॅगस्ट रोजी झालेल्या या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन लाख ७८६०४ मतदारांपैकी प्रत्यक्षात दोन लाख चार हजार ८८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ६ आॅगस्टला मतमोजणी होऊन विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.दरम्यान, जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींपैकी रिसोड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींची सरपंच पदाची निवडणूक झाली असून, उर्वरित ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी आता ग्राम पातळीवर रस्सीखेच सुरू झाली आहे. तालुकानिहाय त्यासाठी वेगवेगळ््या तारखा जिल्हा निवडणूक विभागाने जाहीर केल्या आहेत.ग्रामपंचायतींचा १४ व्या वित्त आयोगाचा थेट निधी मिळणार असल्याने या सरपंचपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. राजकारणही तापले आहे. तहसील कार्यालयाच्यावतीने निवडणुकीच्या अनुषंगाने नायब तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांची सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून नियक्त्याही केल्या असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.