शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

निवडणूका बहुरंगीच

By admin | Updated: September 28, 2014 00:05 IST

अनेकांना अनपेक्षित उमेदवारी: वाशिम जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली.

वाशिम : राज्यात आघाडी युतीत आलेली बिघाडी अन त्यानंतर इच्छूक उमेदवारांची अनपेक्षितपणे दाखल झालेली उमेदवारी यामुळे वाशिम जिल्हय़ातील तीनही विधानसभा मतदारसंघातील निवडणुका कुठे पंचरंगी तर कुठे बहुरंगी लढतीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.जागा वाटपाच्या मुद्यावरुन भाजप शिवसेनेसह इतर घटक पक्षांच्या महायुतीचा घटस्थापनेला घटस्फोट झाला. त्याला काही क्षणाचा वेळ जातो की नाही तोच १५ वर्षापासून राज्यात आघाडी करुन सत्तेत राहणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीतही बिघाडी आली. महायुती व आघाडीतील बिघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, या पक्षानी राज्यातील विधानसभा निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवधीला केवळ ४८ तासाचा अवधी बाकी राहिला असताना घेण्यात आल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आजवर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंंत कायम संभ्रमावस्था राहिली. अर्थात या संभ्रमावस्थेच्या शेवटच्या क्षणापर्यंंत उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या आजवरच्या सर्वच पक्षाकडील अनेक इच्छुक उमेदवारांनी अनपेक्षि तपणे ज्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती त्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल न करता ऐन वेळी दुसर्‍याच पक्षाकडून ए.बी. फॉर्मसह थेट उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. आजघडीला निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पाहता पक्षासाठी काम करणार्‍या अनेक कार्यक र्त्यांंना कोणता झेंडा घेवू हाती च्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली असली तरी रिसोड- मालेगाव, वाशिम-मंगरुळपीर व कारंजा-मानोरा या तीनही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी यासह इतर छोट्या मोठय़ा पक्षाच्या वतीने अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने होवू घातलेली विधानसभा निवडणूक जिल्हय़ाच्या राजकीय समिकरणांना कलाटणी देणारी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनपेक्षित दाखल झालेल्या उमेदवार्‍या, अनेक इच्छुकांचे ऐनवेळी उमेदवारी मिळण्याचे भंगलेले स्वप्न व सर्वच राजकीय पक्षांची एकला चलो रे ची हाक यामुळे वाशिम जिल्हय़ातील तीनही विधानसभा निवडणुका कुठे पंचरंगी तर कुठे बहुरंगी होण्याची शक्यता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसानंतर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांंमुळे वर्तविली जात आहे.