शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

निवडणूक मानधनाची अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST

ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २५५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ...

ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २५५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २९ जण कोरोना बाधित आढळले, तर ५३९ मतदान केंद्रासाठी अधिकारी, कर्मचारी मिळून २२०६ जणांची नियुक्ती करण्यात आली. ही मतदान प्रक्रिया १८ जानेवारीला पार पडली. शासनाकडून ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चापोटी प्रती ग्रामपंचायत २५ हजार रुपयांचा निधी दिला जातो. जिल्ह्यात पार पडलेल्या १५२ ग्रामपंचायतींसाठी सुरुवातीला प्रती ग्रामपंचायत १५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आणि तो तहसीलस्तरावर वर्गही करण्यात आला; परंतु निवडणुकीच्या खर्चात प्राधान्य क्रमानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा क्रम शेवटचा येतो. त्यामुळे अद्यापही निवडणुकीचे मानधन अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळू शकले नाही.

१) पॉईंटर्स

जिल्ह्यात निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती - १५२

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले अधिकारी - ५३९

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले कर्मचारी - १६६७

२) तालुकानिहाय आढावा

तालुका ग्रामपंचायती अधिकारी-कर्मचारी

वाशिम १९

रिसोड ३२

मालेगाव २८

मंगरुळपीर २५

मानोरा २१

कारंजा १७

------------------------------

३) शासनाकडून मिळाले प्रती ग्रामपंचायत १५ हजार

निवडणूक खर्चापोटी प्रती ग्रामपंचायत २५ हजारांचा निधी जिल्हा निवडणूक विभागास प्राप्त होतो. त्यापैकी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात पार पडलेल्या १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक खर्चापोटी प्रती ग्रामपंचायत १५ हजार रुपयांचाच निधी जिल्हा निवडणूक विभागास प्राप्त झाला. हा निधी तहसीलस्तरावर वर्गही करण्यात आला; परंतु या निधीतून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनाऐवजी इतर प्रक्रियेसाठी झालेल्या खर्चाची अदायगी करण्यास प्राघान्य देण्यात आले. त्यानंतर अद्यापही शासनस्तरावरून निवडणूक खर्चापोटी निधी प्राप्त झालेला नाही.

----------------

४) एकाही तालुक्यात मानधनाचे पूर्ण वितरण नाही

जिल्ह्यात पार पडलेल्या १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक खर्चापोटी प्रती ग्रामपंचायत २५ हजार निधीतून प्रत्येकी १५ हजारांचा निधी शासनस्तरावरून प्राप्त झाला असला तरी, त्यातून इतर खर्चाचीच अदायगी करण्यास प्राधान्य देण्यात आल्याने जिल्ह्यातील सहाही तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधनाचे पूर्ण वितरण अद्यापही होऊ शकले नाही. त्यामुळे निवडणुकीत केवळ मानधन केव्हा, अशा प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त होत आहेत.