शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आठ गावे झाली हगणदरीमुक्त !

By admin | Updated: November 5, 2015 02:16 IST

मानोरा तालुक्यातील एकही गाव हगणदरीमुक्त नाही.

वाशिम : स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने ऑक्टोबरअखेर जिल्ह्यातील आठ गावे हगणदरीमुक्त करण्यात यश मिळविले आहे. मानोरा तालुक्यातील एकही गाव हगणदरीमुक्त होऊ शकले नाही, हे विशेष. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शौचालय बांधकाम आणि हगणदरीमुक्त गाव, या दोन बाबींवर विशेष भर दिला जात आहे. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असून, यामधील गावांत शौचालय बांधकाम मोठय़ा प्रमाणात केले जात आहे. पहिल्या टप्प्यात २८ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून, ११ हजार २९ शौचालयाचे बांधकाम केले जाणार आहे. ९ ऑगस्ट या क्रांतीदिनापासून जिल्हा परिषदेने ह्यसंपूर्ण स्वच्छतेची ऑगस्ट क्रांतीह्ण या नावाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेने ऑक्टोबरअखेर आठ गावे हगणदरीमुक्त घोषित केले असून, या गावांमध्ये १४७ शौचालयांचे बांधकाम झाले आहे. कारंजा तालुक्यातील तुळजापूर, धोत्रा जहागीर व डोंगरगाव, वाशिम तालुक्यातील साखरा, हिवरा रोहिला, रिसोड तालुक्यात केशवनगर, मालेगावात इरळा व मंगरुळपीर तालुक्यातील शेलगाव ही गावे हगणदरीमुक्त घोषित केली आहेत. अधिकाधिक गावे हगणदरीमुक्त करण्यासाठी दिवाळीनंतर २८ ग्रामपंचायतींमध्ये ह्यगूड मॉर्निंग पथकह्ण कार्यान्वित केले जाणार आहे. उघड्यावर शौचास जाणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी शौचालय बांधकाम करून त्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले.