शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आठ हजार निराधार ‘आधार’पासून वंचित!

By admin | Updated: December 27, 2016 02:29 IST

अद्याप सुमारे आठ हजार लाभार्थींनी आधार कार्ड काढले नसल्याची माहिती.

वाशिम, दि. २६-विविध स्वरूपातील योजनांच्या माध्यमातून निराधार लाभार्थींना शासनाकडून मानधन पुरविले जाते. मात्र, अशा लाभार्थींना यापुढे आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी ३0 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. असे असताना अद्याप सुमारे आठ हजार लाभार्थीेंनी आधार कार्ड काढले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या राज्यपुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य नवृत्ती वेतन योजना, केंद्रपुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विधवा नवृत्ती वेतन, राष्ट्रीय अपंग नवृत्ती वेतन व राष्ट्रीय कुटुंब आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लाभार्थींचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या खात्यात जमा करणे शक्य व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर योजनांच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, याकरिता प्रशासनाने जिल्हाभर विविध टप्प्यात विशेष मोहीम राबविली. तत्पूर्वी प्रशासनाकडे जिल्ह्यातील ९२ हजार ५१६ लाभार्थींपैकी ७२ हजार ८७५ लाभार्थींनी आधार कार्ड सादर केले होते; तर विशेष मोहिमेंतर्गत त्यात आणखी ६ हजार ९३७ लाभार्थीच्या आधार क्रमांकाची भर पडली. प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील बाहेरगावी गेलेल्या ७१0 लाभार्थींसह सुमारे आठ हजार लाभार्थींचो आधार क्रमांक अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थींंचे नोव्हेंबर महिन्याचे मानधन थांबविण्यात आले आहे. सोबतच राज्य पुरस्कृत योजनांतील लाभार्थींसाठी आधार क्रमांक सादर करण्यास ३0 डिसेंबरपर्यंंत; तर केंद्रपुरस्कृत योजनांच्या लाभार्थींंसाठी १५ डिसेंबरपर्यंंतची मुदत देण्यात आली. परंतु त्याउपरही लाभार्थींंनी आपले आधार क्रमांक अद्याप सादर केलेले नाहीत. तथापि, संबंधित लाभार्थींंना आधार क्रमांक सादर करण्यास आता केवळ चार दिवस शिल्लक असल्याने त्यांनी कुठलाही विलंब न लावता आधार कार्ड काढून त्याची प्रत प्रशासनाकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.