शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

आठ हजार निराधार ‘आधार’पासून वंचित!

By admin | Updated: December 27, 2016 02:29 IST

अद्याप सुमारे आठ हजार लाभार्थींनी आधार कार्ड काढले नसल्याची माहिती.

वाशिम, दि. २६-विविध स्वरूपातील योजनांच्या माध्यमातून निराधार लाभार्थींना शासनाकडून मानधन पुरविले जाते. मात्र, अशा लाभार्थींना यापुढे आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी ३0 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. असे असताना अद्याप सुमारे आठ हजार लाभार्थीेंनी आधार कार्ड काढले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या राज्यपुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य नवृत्ती वेतन योजना, केंद्रपुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विधवा नवृत्ती वेतन, राष्ट्रीय अपंग नवृत्ती वेतन व राष्ट्रीय कुटुंब आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लाभार्थींचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या खात्यात जमा करणे शक्य व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर योजनांच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, याकरिता प्रशासनाने जिल्हाभर विविध टप्प्यात विशेष मोहीम राबविली. तत्पूर्वी प्रशासनाकडे जिल्ह्यातील ९२ हजार ५१६ लाभार्थींपैकी ७२ हजार ८७५ लाभार्थींनी आधार कार्ड सादर केले होते; तर विशेष मोहिमेंतर्गत त्यात आणखी ६ हजार ९३७ लाभार्थीच्या आधार क्रमांकाची भर पडली. प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील बाहेरगावी गेलेल्या ७१0 लाभार्थींसह सुमारे आठ हजार लाभार्थींचो आधार क्रमांक अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थींंचे नोव्हेंबर महिन्याचे मानधन थांबविण्यात आले आहे. सोबतच राज्य पुरस्कृत योजनांतील लाभार्थींसाठी आधार क्रमांक सादर करण्यास ३0 डिसेंबरपर्यंंत; तर केंद्रपुरस्कृत योजनांच्या लाभार्थींंसाठी १५ डिसेंबरपर्यंंतची मुदत देण्यात आली. परंतु त्याउपरही लाभार्थींंनी आपले आधार क्रमांक अद्याप सादर केलेले नाहीत. तथापि, संबंधित लाभार्थींंना आधार क्रमांक सादर करण्यास आता केवळ चार दिवस शिल्लक असल्याने त्यांनी कुठलाही विलंब न लावता आधार कार्ड काढून त्याची प्रत प्रशासनाकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.