शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा दर पोहोचला १३० रुपये प्रतिकिलोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:37 IST

.................... वाशिममध्ये कोरोनाचे २ नवे रुग्ण आढळले वाशिम : शहरातील नवीन आययूडीपी कॉलोसह अन्य ठिकाणचा एक असे कोरोना विषाणू ...

....................

वाशिममध्ये कोरोनाचे २ नवे रुग्ण आढळले

वाशिम : शहरातील नवीन आययूडीपी कॉलोसह अन्य ठिकाणचा एक असे कोरोना विषाणू संसर्गाने बाधित दोन नवे रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी खबरदारी बाळगून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

....................

प्रवासीच मिळत नसल्याने ऑटोचालकांवर उपासमार

शिरपूर जैन : लॉकडाऊनदरम्यान ८ ते ९ महिने व्यवसाय पूर्णत: ठप्प झाल्याने ऑटोचालक आर्थिक अडचणीत सापडले होते. अशात शिरपूर येथे पर्यटकांची रेलचेलच नसल्याने ऑटोचालकांना सध्या प्रवासीच मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

.......................

अडोळी येथे योग शिबिर उत्साहात

वाशिम : तालुक्यातील ग्राम अडोळी येथे बुद्धसासन फाउंडेशनने १७ जानेवारी रोजी योग व प्राणायाम शिबिर घेतले. योग प्रशिक्षक म्हणून सुधाकर नगरे यांचे मार्गदर्शन लाभले. योगाचे विविध प्रकार, प्राणायाम, कपालभाती, भ्रस्तीका याबाबत त्यांनी माहिती दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बुध्दसासन फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज पडघान, अ‍ॅड. पट्टेबहादूर, सतीश खंडारे, हरिष पडघान, संदीप पडघान, मधुकर पडघान, शरद खंडारे, प्रशांत पडघान, प्रमोद पडघान आदींनी परिश्रम घेतले.

...................

अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशिम : पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने जिल्ह्यातील कुठल्याच वाळूघाटाचा लिलाव झालेला नाही. असे असताना अव्वाच्या सव्वा दर आकारून वाळूची अवैध वाहतूक सुरूच आहे. या गंभीर बाबींकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

...................

मधुमक्षिका पालनाकडे वळण्याचे आवाहन

वाशिम : मधुमक्षिका पालन व्यवसायातून दारिद्रय रेषेखालील महिलांना आत्मनिर्भर करण्याचा उद्देश बाळगण्यात आला आहे. या माध्यमातून भरीव प्रयत्न केले जात असून, महिलांनी मधुमक्षिका पालनाकडे वळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

................

जलसंपदाकडून कॅनॉलची दुरूस्ती

अनसिंग : रबी हंगामातील पिकांसाठी सिंचन प्रकल्पांमधील पाणी कालव्यांव्दारे सोडले जात आहे. काहीठिकाणचे कालवे नादुरूस्त झाले होते. त्याची जलसंपदाकडून दुरूस्ती केली जात आहे.

.................

सेंद्रीय शेतीचे प्रमाण वाढले

तोंडगाव : परिसरात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रीय शेतीचे प्रमाण वाढले आहे. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाला विक्रीसाठी कृषी विभागाने व्यवस्था निर्माण केल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचे ‘आत्मा’चे तालुका समन्वयक जयप्रकाश लव्हाळे यांनी सांगितले.