शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

रानभाज्या खा अन् निरोगी राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:46 IST

वाशिम जिल्ह्यात विविध प्रकारच्या रानभाज्या, रानफळे आढळतात. त्यात तरोटा, फांज, करटुले, तांदूळजा, वाघाटे, शतावरी, मसाला भाजी, चमकुरा, वाल, वावडींग, ...

वाशिम जिल्ह्यात विविध प्रकारच्या रानभाज्या, रानफळे आढळतात. त्यात तरोटा, फांज, करटुले, तांदूळजा, वाघाटे, शतावरी, मसाला भाजी, चमकुरा, वाल, वावडींग, लाल माठ, हिरवा माठ, चिवळ, कढिपत्ता, कुर्डू, शेवगा शेंग, हादगा फुले, आघाडा, केना, करवंद तसेच गुळवेल, अश्वगंधा सारख्या वनौषधींचाही समावेश आहे.

-----------

या रानभाज्या पाहिल्यात का

आघाडा :

या भाजीमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते; ही भाजी ‘पाचक’ असून मूतखडा, मूळव्याध व पोटदुखीवर गुणकारी आहे. आघाडा रक्तवर्धक आहे व हाडे बळकट होण्यासाठी तो खाल्ला जातो.

-----------

फांज :

ही दुर्मीळ वनस्पती असून, तिची भाजी करण्यासह भजीदेखील केली जातात. या भाजीच्या सेवनाने हृदय मजबूत होण्यासह डोळ्यांसाठी ती लाभदायक असते.

शेताच्या बांधावर ही भाजी उगवते.

-----------

कटुर्ले : रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी कटुर्ले गुणकारी असतात. तसेच पोटदुखी, जंत होणे यांसारख्या त्रासांमध्ये या भाजीचे सेवन केल्याने हा त्रास थांबतो. रानावनात या भाजीचे वेल येतात.

-----------

कुर्डूची भाजी : या भाजीच्या सेवनामुळे पोटाचे विकार नष्ट होऊन पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. ही भाजी डोंगरात मिळते. बाजारात कातकरणी घेऊन येतात. चव साधारण माठाच्या भाजीप्रमाणेच असते.

-----------

या रानभाज्या झाल्या गायब

दुडीचे फूल :

हे फूल अत्यंत गुणकारी असते. याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढून उत्साह कायम राहण्यास मदत होते. हाडातील ताप कमी होण्यासही यामुळे मदत होते.

-----------

कडमडवेली :

पांढऱ्या रंगाच्या या वेलीला कोवळे अंकुर येतात. या भाजीत पोटाचे आजार बरे करण्याची क्षमता आहे. या भाजीतील गुणधर्मांमुळे कफप्रवृत्तीही दूर होते.

-------------------

शक्तिवर्धक रानभाज्या :

कोट : नैसर्गिकरित्या उगवलेल्या व निसर्गातीलच अर्थात पावसाच्या पाण्यावर वाढलेल्या रानभाज्या शरीरासाठी मोठ्या लाभदायक आहेत. विविध रानभाज्यांचे औषधी गुणधर्म पाहिले तर प्रत्येक भाजीतून शरीराच्या प्रत्येक अवयवाला लाभच होणारा असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा रानमेवा खाऊन आरोग्य स्वस्थ ठेवता येते.

- सुनीता लाहोरे, आहार तज्ज्ञ