शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

राजुरा येथे भीषण पाणीटंचाई; नागरिक बेहाल!

By admin | Updated: April 26, 2017 02:40 IST

जलस्रोत आटले : टँकरचा प्रस्ताव लालफीतशाहीत

यशवंत हिवराळे - राजुरामालेगाव तालुक्यातील टँकरग्रस्त गाव म्हणून शासनदरबारी नोंद असलेल्या राजूरा येथे सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनातर्फे मार्च महिना उजाडण्यापूर्वीच टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र यावर्षी एप्रिल महिना संपत आला तरी टँकरचा थांगपत्ता नाही. तीन हजारावर लोकसंख्या असलेल्या राजुरा येथील ग्रामस्थांची तहान भागविणारे सार्वजनिक व खासगी पाणवठे व कूपनलिकांनी उन्हाळयाची चाहूल लागण्यापुर्वीच दम तोडला. त्यामुळे ग्रामस्थांना मिळेल त्या ठिकाणावरुन पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. अलीकडच्या दशकभरात राजूरा ग्रामस्थांना भीषण पााण्ीटंचाईचे चटक सोसावे लागत आहे. ‘राजुरा आणि उन्हाळयात टँकर’ हे जणू येथील समिकरणच बनले आहे.पाणीटंचाईची एवढी गंभीर समस्या असताना मात्र गाव परिसरात जलपुनर्भरणच्या कोणत्याच ठोस उपाययोजना राबविल्या जात नाहीत. परिसरात छोटे-मोठे तलाव होण्यास पुरेसा वाव आहे; मात्र राजकीय सारीपाटावरील घुरघोडी व श्रेयाचा वाद तथा प्रशासकीय अधिाकऱ्यांचे उदासीन धोरणामुळे गाव परिसरात एकही तलाव अथवा बंधारा होउ शकला नाही. जलसंपदा विभागाचे वतीने परिसरात अनेकदा सर्वेक्षण झाले. मात्र ते सर्वेक्षण कागदापलीकडे सरकू शकले नाही. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे. जलसंधारणाची कोणतीच कामे नसल्याने येथील पाणीपातळी मोठया प्रमाणावर खालावली आहे. पाचशे फुटाचे कूपनलिकेतून पाण्याचा थेंबही वर येत नसल्याचे अनेक उदाहरणे आहेत. काहींनी तर केवळ घरापुरते पाणी मिळावे म्हणून दोन ते तीन कूपनलिका घेतल्या. मात्र जमिनीतून केवळ धुराळाच बाहेर आल्याची वस्तुस्थिती आहे. पाणीटंचाईची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या तसेच सद्यस्थितीत टँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.