शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

योग्य मार्गदर्शनाअभावी शेतीपूरक जोडधंद्यांची वानवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:51 IST

वाशिम: पारंपरिक पीक पद्धतीवर विसंबून राहणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रतिकुल हवामान आणि पावसाच्या दग्याफटक्यामुळे बहुतांशी नापिकीचे संकट सोसावे लागत आहे. दुसरीकडे जनजागृतीबाबत कृषी विभागाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे शेतीपुरक जोडधंदेही विशेष तग धरू शकले नाहीत. परिणामी, शेतकर्‍यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. 

ठळक मुद्देकृषी विभागाचे दुर्लक्ष ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमुळे वाढला संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पारंपरिक पीक पद्धतीवर विसंबून राहणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रतिकुल हवामान आणि पावसाच्या दग्याफटक्यामुळे बहुतांशी नापिकीचे संकट सोसावे लागत आहे. दुसरीकडे जनजागृतीबाबत कृषी विभागाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे शेतीपुरक जोडधंदेही विशेष तग धरू शकले नाहीत. परिणामी, शेतकर्‍यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. पूर्णत: निसर्गावर विसंबून असलेली तथा हंगामनिहाय पारंपरिक पीक पद्धतीनुसार शेती कसत असताना नापिकी ओढवत असल्याचा अनुभव गेल्या ४ ते ५ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना येत आहे. यातून उद्भवणार्‍या आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी शेतीपुरक जोडधंदे फायदेशीर ठरू शकतात; मात्र जिल्ह्यात डेअरी फार्मीग व मिल्क प्रोससींग प्रॉडक्टस, पोल्ट्री, शेळीपालन, फुड प्रोसेसींग, ईमू-पालन, बटेर पालन, ससे पालन, छोट्या स्वरूपातील डाळ मिल उद्योग, मधू-मक्षिका पालन, मत्स्य व्यवसाय, भाजीपाला डिहायड्रेशन (सुकविणे), अळींबी उत्पादन, मशरुम उत्पादन, रेशीम उद्योग, दुग्धोत्पादन यापैकी कुठलाच व्यवसाय तग धरू शकला नाही.  कृषी  विभागाचे दुर्लक्षित धोरण यासाठी कारणीभूत मानले जात आहे. 

शेतीला जोडधंदा ही काळाची गरज असून त्यासंबंधी वेळोवेळी शेतकर्‍यांचे उद्बोधन केले जाते; मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटल्यामुळे शेतकर्‍यांमध्येही जोडधंदे उभारण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. कृषी विभागाचे मात्र प्रयत्न सुरूच आहेत. - दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी