शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

फळ, फुलशेतीचे प्रमाण घटले!

By admin | Updated: May 3, 2017 01:45 IST

कृषी विभागाचे दुर्लक्ष : अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी शेतकरी अनभिज्ञ

वाशिम : जिल्ह्यात कधीकाळी संत्रा, मोसंबी, पपई, आंबा, द्राक्ष, चिकू, कागदी निंबू आदी फळ पिकांसह गुलाब, झेंडू, लिली, मोगरा, शेवंती यासारख्या फुलांचेही उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढायला लागली होती. सद्या मात्र फळबागांसोबतच फुलशेतीलाही उतरती कळा प्राप्त झाली असून योग्य मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांमध्येही याप्रती उदासिनता दिसून येत आहे.जिल्ह्यात सद्या केवळ १५५ हेक्टर क्षेत्रावर सुट्या फुलांचे (झेंडू) उत्पादन घेतले जाते. गुलाबाची शेती नाममात्र २ ते ३ हेक्टरवर असून इतर कुठल्याच फुलाचे उत्पादन जिल्ह्यात होत नाही. विविध प्रकारच्या फुलांसाठी स्थानिक स्तरावर मोठी बाजारपेठ उपलब्ध असताना विपरित हवामान, ग्रीन हाऊस तंत्रज्ञानासंबंधी मार्गदर्शनाचा अभाव आणि कृषी विभागाच्या उदासिन धोरणांमुळेच शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.फळबाग लागवडीसंदर्भातही जिल्ह्यात हेच चित्र असून जिल्ह्यातील एकंदरित पेरणीलायक ४.७५ लाख हेक्टर क्षेत्रापैकी उण्यापूऱ्या ५ हजार हेक्टरवर फळबागा उभ्या आहेत. त्यात विशेषत: मालेगाव, मंगरूळपीर या दोन तालुक्यांमध्ये संत्र्याचे अधिक उत्पन्न घेतले जाते. काहीठिकाणी पपई आणि आंब्याचे उत्पादन घेतले जात असून ही ठराविक फळे वगळता इतर कुठल्याच फळांचे जिल्ह्यात उत्पन्न घेतले जात नाही. कृषी विभागाकडून अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी पुरेशी माहिती न मिळणे, प्रतिकुल हवामान आणि पाण्याच्या कमतरतेमुळेच शेतकरी केवळ पारंपरिक पिकांवर विसंबले असून फळबाग, फुलशेतीकडे त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यात अधिकांश शेतजमिन कोरडवाहू असून डाळींब, द्राक्ष, अंजीर आदी फळपिके प्रतिकुल हवामानामुळे तग धरत नाहीत. याशिवाय दरवर्षी पाण्याची देखील कमतरता भासते. त्यामुळेच फळबाग, फुलशेतीचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्याकरिता कृषी विभागाकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत.- दत्तात्रेय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम