शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

दुबार पेरणी, चारा व पाणी टंचाई बाबत उपाययोजना

By admin | Updated: July 13, 2014 22:44 IST

मंगरूळपीर येथे टचाई आढावा बैठक : जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या सुचना

मंगरुळपीर : तालुक्यात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेली पाणी व चारा टंचाईवर मात करण्यासाठी त्वरीत उपाय योजना राबविण्याला प्राधान्य दय़ाव,े ज्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्या ठिकानी विहीर अधिग्रहन करून किंवा टॅकरव्दारे पाणी पुरवठा करावा, जनावरांसाठी अनुदानावर चारा डेपो सुरू करावे तसेच ज्या भागात पेरण्या उलटल्या आहेत त्या परिसरातील शेतीचे तलाठी अथवा कृषी सहाय्यकाच्या वतीने सर्व्हेक्षण करावे अश्या सुचना जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकर १२ जुलैला पार पडलेल्या पंचायत समितीच्या आढावा बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला केल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती भाष्कर पाटील शेगीकर होते. मंगरूळपीर तालुक्यावर यंदा कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेला पावसात पेरण्या उरकुन घेतल्या. मात्र त्यानंतर अचानक पावसाने दडी मारली. पाऊस गायब झाल्यामुळे पेरलेली पिके करपू लागली. परिणामी, शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची पाळी ओढविली आहे. अश्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासानाकडुन आर्थिक मदत मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. परंतु तत्पूर्वी तहसिल व कृषी विभागाच्या प्रशासनाने उलटलेल्या पेरण्यांचे सर्व्हेक्षण सुरू करावे अश्या सुचना ठाकरे यांनी बैठकीत केल्या. शिवाय तालुक्यातील बहुतांश गावात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. त्याकरिता विनाविलंब उपाय योजना करण्या संदर्भातही त्यांनी सुचित केले. सदर आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी दिनकर काळे, तहसिलदार बळवंत अरखराव, पंचायत समितीच्या उपसभापती जयङ्म्री कातडे, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश जाधव, अशोकराव खराबे,शंकरराव सावके, शिवदास पाटील, विश्‍वास गोदमले, रजनीताई ताटके, पंचायत समिती सदस्य सुभाष शिंदे, विलास लांभाडे, संतोष इंगळे, आमटे, शेरूभाई फकिरावाले, संतोष भगत,देवराव डहाणे,रवि चव्हाण, रफीकाबी युनूस खान, मनवर आदी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्या सरपंच व उपसरपंचानीही विविध विषयावरील शंका अधिकार्‍यांसमोर उपस्थित केल्या. बैठकीत उपविभागीय अधिकारी काळे यांनी चारा व पाणी टंचाई संदर्भात आढावा घेतला. गाव निहाय पाणी टंचाई बाबत नादुरूस्त हातपंप, विहीरीची गाव निहाय माहीती घेतल्यानंतर पाणी टंचाई निवारण्या संदर्भात ग्राम पंचायतीने उपाय योजना राबविण्यासाठी प्रस्ताव तयार करावे व ग्रामसेवक संपावर असल्यामुळे रोजगार सेवकांची मदत घ्यावी सदर प्रस्ताव पंचायत समितीला सादर करावे. ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत प्रलंबीत शेतकर्‍यांना सिंचन विहीरीचे देयके देण्यासाठी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन अधिकार्‍यांनी केले. पाणी टंचाई बाबत कामचुकार पणा करणार्‍या कर्मचार्‍यांची गय केल्या जाणार नसल्याचा इशारा यावेळी उपविभागीय अधिकारी दिनकर काळे यांनी दिला.