शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

‘प्रभारीं’मुळे मानो-याचा विकास खुंटला!

By admin | Updated: February 29, 2016 02:16 IST

तत्कालिन ग्रामपंचायतच्या कर्मचा-यांवरच डोलारा; पदाधिकारी हतबल.

मानोरा: मागासलेपणाचा ठपका पुसण्यासाठी निघालेल्या मानोरा नगर पंचायतला अद्यापही हक्काचे अधिकारी- कर्मचारी मिळाले नसल्याने शहरातील समस्या ह्यजैसे थेह्ण आहेत. मानोरा शहराला नगर पंचायतचा दर्जा मिळाला; परंतु कार्यभार चालविण्याकरिता कायमस्वरुपी मुख्याधिकारी नाही. प्रभारी मुख्याधिकार्‍यांवर कारंजा व मानोरा दोन्ही ठिकाणची जबाबदारी असल्याने मानोर्‍याला सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. नगर पंचायतचे कार्यालय नाही, मूलभूत सुविधा नाहीत. शासनाकडून निधी नाही आणि स्थानिक विविध प्रकारचे कर वसूल करण्यासाठी वसुली अधिकारी व इतर कर्मचारी नाहीत. शहराला पाण्याची मुख्य समस्या भेडसावत आहे. पाइपलाइन तयार आहे; मात्र जीवन प्राधिकरणासोबत करारनामा बाकी आहे. पाण्याअभावी नागरिक त्रस्त होत आहेत. निर्णयाची अंमलबजावणी करणारी सक्षम यंत्रणा निर्माण झाली नसल्याने पदाधिकारीही हतबल ठरले असल्याचे दिसून येते. विकासात्मक कामांचे प्रस्ताव करून मंजूर करणे, खर्चाचा अंदाज बांधण्याकरिता अभियंता नाही. शहरात कचर्‍याचे ढीग पडले असून, नाल्या तुडूंब भरलेल्या आहेत. अद्यापही सफाई कामगार उपलब्ध झाले नाहीत. नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवड होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी बसण्यासाठी कक्ष नाहीत. तत्कालिन ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांच्या भरवशावर कारभार सुरू आहे. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांची विकासात्मक कामांसाठी धडपड असली तरी कायद्याच्या बडग्यामुळे विकासात्मक कामांत आडकाठी निर्माण होत असल्याचे दिसून येते. कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्यामुळे 'नमुना ८ अ' देण्याचे आश्‍वासन 'जैसे थे'च आहे. रस्त्यालगतचे, नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या सूचना अधिकार्‍यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. अतिक्रमणात कुणाच्याही घरावर ह्यगजराजह्ण चालणार नाही, याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली. प्रत्यक्षात काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मानोर्‍याला कायमस्वरुपी मुख्याधिकारी द्यावा, आवश्यक मनुष्यबळाची पदे भरण्यात यावी, आदी मागण्या शहरवासियांकडून होत आहेत.