शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

कोरड्या दुष्काळाचे सावट; मात्र नजरअंदाज पैसेवारी ५८ पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:25 IST

वाशिम : शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि  त्यामुळे खरीप हंगामात उद्भवलेले नापिकीचे संकट तद्वतच  अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम, जिल्ह्यावर घोंगावत  असलेले दुष्काळाचे सावट, या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा  प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजरअंदाज पैसेवारी ५0  पैशांपेक्षा अधिक अर्थात सरासरी ५८ पैसे जाहीर केली.  प्रशासनाच्या या अजब धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर  उमटत आहे. 

ठळक मुद्देप्रशासनाचे अजब धोरण शेतकर्‍यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि  त्यामुळे खरीप हंगामात उद्भवलेले नापिकीचे संकट तद्वतच  अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम, जिल्ह्यावर घोंगावत  असलेले दुष्काळाचे सावट, या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा  प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजरअंदाज पैसेवारी ५0  पैशांपेक्षा अधिक अर्थात सरासरी ५८ पैसे जाहीर केली.  प्रशासनाच्या या अजब धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर  उमटत आहे. पीक पैसेवारी हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा  आहे. त्यामुळे त्यात कसूर न होता दुष्काळसदृश स्थितीत  शासनाकडून मिळणारे सर्व फायदे पदरात पडावे, अशी शे तकर्‍यांची अपेक्षा असते. दरम्यान, यंदा परिस्थिती अत्यंत बिकट  असून, पावसाळ्याचे दिवस संपत आले असतानाही जिल्ह्यात  पावसाने सरासरी गाठलेली नाही. यामुळे लघू आणि मध्यम अशा  सर्वच १२५ सिंचन प्रकल्पांमध्ये थोडाथोडकाच पाणीसाठा  शिल्लक असून, पाण्याअभावी सोयाबीनच्या एकरी उत्पन्नात मोठी  घट झाली आहे. तूर, मूग, उडीद या पिकांपासूनही विशेष उत्पन्न  हाती पडणार नसल्याचे संकेत आहेत. पाण्याअभावी आगामी  रब्बी हंगामावरही संकट घोंगावत आहे. असे असताना जिल्हा  प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी ५८ पैसे कुठल्या आधारावर  काढली, असा सवाल शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे.