शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट!

By admin | Updated: July 7, 2017 01:23 IST

एकट्या मानोरा तालुक्यात ४०० हेक्टरवर दुबार पेरणी : पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. दरम्यान, मानोरा तालुक्यात महाबीजचे बियाणे उगवलेच नसल्याने ४०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. अन्य तालुक्यातील पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.यावर्षी वेळेवर पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने सुरुवातीला वर्तविला होता. त्यानंतर पाऊस लांबणीवर पडणार असल्याचा अंदाजही वर्तविला. वाशिम जिल्ह्यात मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला; मात्र त्यानंतर पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या. ४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७७ टक्के शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. यावर्षी कृषी विभागाने एकूण चार लाख नऊ हजार ६३ हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले. ४ जुलैपर्यंत ९२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दरम्यान, गत दहा ते बारा दिवसांपासून पिकास योग्य असा पाऊस नसल्याने कमी दर्जाच्या जमिनीवरील पिके कोमेजून जात असल्याचे दिसून येते. मानोरा तालुक्यात कारपा परिसरात महाबीजचे बियाणे उगविले नसल्याने जवळपास ४०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य सचिन रोकडे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर त्रिसदस्य चौकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीने कृषी विभागाकडे अहवाल सादर केला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. कारंजा तालुक्यात अत्यल्प पाऊस असल्याने पेरणीचे क्षेत्रही कमी आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मालेगाव तालुक्यातील मारसूळ परिसरात शिवा घुगे, गणपत घुगे, विठ्ठल घुगे, हिम्मतराव घुगे यांसह काही शेतकऱ्यांनी यापूर्वीच दुबार पेरणी केलेली आहे. गत आठ ते दहा दिवसांपासून पाऊस नसल्याने तिबार पेरणीची भीती या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दुबार व तिबार पेरणीसाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मारसूळ येथील प्रकाश घुगे, मारोतराव मुंडे, महादेव घुगे, श्याम घुगे, प्रकाश भेंडेकर, गणपत घुगे आदींनी केली आहे. मंगरूळपीर तालुक्यातही पिकास पोषक असा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. १० ते १५ जूनदरम्यान पेरणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी ठिबक व अन्य माध्यमातून सिंचन करीत पिके वाचविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे दिसून येते. रिसोड तालुक्यातील वाकद परिसरातील काही शेतकऱ्यांनीदेखील सिंचनाद्वारे पिकांना पाणी देणे सुरू केले. कोरडवाहू शेतकऱ्यांनी मात्र दुबार पेरणीची भीती व्यक्त केली. जऊळका रेल्वे परिसरातही दुबार पेरणीची शक्यता वर्तविली जात आहे. माळरानावरील पिकांनी माना खाली टाकल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे. रिठद परिसरात काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. या पिकांनादेखील दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या चार-पाच दिवसात पाऊस आला नाही तर तिबार पेरणी करावी लागण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली. रिठद परिसरातील शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शारदा नारायण आरू यांनी ६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देत शासनाकडे केली आहे.