शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

दुबार पेरणीचे संकट!

By admin | Updated: July 7, 2017 01:23 IST

एकट्या मानोरा तालुक्यात ४०० हेक्टरवर दुबार पेरणी : पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. दरम्यान, मानोरा तालुक्यात महाबीजचे बियाणे उगवलेच नसल्याने ४०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. अन्य तालुक्यातील पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.यावर्षी वेळेवर पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने सुरुवातीला वर्तविला होता. त्यानंतर पाऊस लांबणीवर पडणार असल्याचा अंदाजही वर्तविला. वाशिम जिल्ह्यात मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला; मात्र त्यानंतर पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या. ४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७७ टक्के शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. यावर्षी कृषी विभागाने एकूण चार लाख नऊ हजार ६३ हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले. ४ जुलैपर्यंत ९२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दरम्यान, गत दहा ते बारा दिवसांपासून पिकास योग्य असा पाऊस नसल्याने कमी दर्जाच्या जमिनीवरील पिके कोमेजून जात असल्याचे दिसून येते. मानोरा तालुक्यात कारपा परिसरात महाबीजचे बियाणे उगविले नसल्याने जवळपास ४०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य सचिन रोकडे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर त्रिसदस्य चौकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीने कृषी विभागाकडे अहवाल सादर केला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. कारंजा तालुक्यात अत्यल्प पाऊस असल्याने पेरणीचे क्षेत्रही कमी आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मालेगाव तालुक्यातील मारसूळ परिसरात शिवा घुगे, गणपत घुगे, विठ्ठल घुगे, हिम्मतराव घुगे यांसह काही शेतकऱ्यांनी यापूर्वीच दुबार पेरणी केलेली आहे. गत आठ ते दहा दिवसांपासून पाऊस नसल्याने तिबार पेरणीची भीती या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दुबार व तिबार पेरणीसाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मारसूळ येथील प्रकाश घुगे, मारोतराव मुंडे, महादेव घुगे, श्याम घुगे, प्रकाश भेंडेकर, गणपत घुगे आदींनी केली आहे. मंगरूळपीर तालुक्यातही पिकास पोषक असा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. १० ते १५ जूनदरम्यान पेरणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी ठिबक व अन्य माध्यमातून सिंचन करीत पिके वाचविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे दिसून येते. रिसोड तालुक्यातील वाकद परिसरातील काही शेतकऱ्यांनीदेखील सिंचनाद्वारे पिकांना पाणी देणे सुरू केले. कोरडवाहू शेतकऱ्यांनी मात्र दुबार पेरणीची भीती व्यक्त केली. जऊळका रेल्वे परिसरातही दुबार पेरणीची शक्यता वर्तविली जात आहे. माळरानावरील पिकांनी माना खाली टाकल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे. रिठद परिसरात काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. या पिकांनादेखील दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या चार-पाच दिवसात पाऊस आला नाही तर तिबार पेरणी करावी लागण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली. रिठद परिसरातील शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शारदा नारायण आरू यांनी ६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देत शासनाकडे केली आहे.