शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात दुष्काळसदृश परिस्थितीत ‘मग्रारोहयो’च्या कामांनाही ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 21:14 IST

सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार नसल्याने पर्यायाने मजूरांनाही रोजगार मिळणार नाही. अशा स्थितीत शासनाकडून रोजगार मिळणे आवश्यक असताना मग्रारोहयोच्या कामांना ‘ब्रेक’ लागला असून तालुका पातळीवरूनही नवीन कामांची मागणी नसल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देमजूरांना रोजगार मिळेनातालुका पातळीवरून नवीन कामांची मागणी नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा अपु-या पावसामुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागातील पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार नसल्याने पर्यायाने मजूरांनाही रोजगार मिळणार नाही. अशा स्थितीत शासनाकडून रोजगार मिळणे आवश्यक असताना मग्रारोहयोच्या कामांना ‘ब्रेक’ लागला असून तालुका पातळीवरूनही नवीन कामांची मागणी नसल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.ग्रामीण भागातील मजूरांचा शेतातील कामांवरच उदरनिर्वाह चालतो. यंदा मात्र परिस्थिती अत्यंत बिकट असून सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने रब्बी हंगामात ५० टक्के पेरणी देखील होणार नसल्याचे संकेत कृषी विभागाकडून वर्तविले जात आहेत. त्यामुळे मजूरांच्या हाताला काम मिळणार नाही. ही बाब लक्षात घेता, प्रशासकीय पातळीवरून जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू करून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गटविकास अधिकाºयांनी आपापल्या तालुक्यांमधील अपूर्ण कामे पूर्ण करून घेऊन नवीन कामांची मागणी करणे गरेजेचे आहे. मात्र, सद्यातरी जुनी कामे बंद असून नवीन कामांचीही मागणी नसल्याचे सूत्रांनी सांगितले.