शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक सिंचन योजनेचे अनुदान अद्याप अप्राप्त

By admin | Updated: March 7, 2016 02:18 IST

शेतकरी हवालदिल: १५.२२ कोटींच्या अनुदान रकमेची शेतक-यांना प्रतीक्षा.

वाशिम: ठिबक व तुषार सिंचन योजनेंतर्गतचे जवळपास ९७00 शेतक-यांचे १५.२२ कोटी रुपयांचे अनुदान एका वर्षानंतरही शेतकर्‍यांना मिळाले नसल्याने रोष व्यक्त होत आहे.शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजनेंतर्गतच्या अनुदानातून शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, अनुदानाची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या समस्येत अधिकच भर पडत असल्याचे दिसून येते. विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकर्‍यांना अनुदान दिले जाते. यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर शेतकर्‍यांची निवड केली जाते. २0१४-१५ या वर्षात वाशिम जिल्ह्यातील ९ हजार ७४६ शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यामध्ये मानोरा तालुक्यातील ८३0 शेतकर्‍यांचा समावेश आहे. या सर्व पात्र लाभार्थी शेतकर्‍यांना १६ कोटी २८ लाख ३0 हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागामार्फत मिळणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल एका वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही. अवर्षण, अतवृष्टी, गारपीट आणि अनियमित पाऊस यामुळे आधीच अवर्षण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अनुदानाअभावी सिंचन सुविधा उपलब्ध करणे कठीण होऊन बसले आहे. ठिबक व तुषार संचासाठी जिल्ह्यातील ९ हजार ७४६ शेतकर्‍यांनी गतवर्षी ऑनलाइन अर्ज केले होते. २0१५-१६ हे आर्थिक वर्ष संपत असतानाही शेतकर्‍यांना अनुदान मिळत नसल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. अगोदरच तीन-चार वर्षांपासून निसर्गाची साथ नाही. अशातच शासनही अनुदानाची रक्कम देत नसल्याने शेतकर्‍यांच्या समस्येत भर पडत आहे. दरम्यान, ठिबक व तुषार सिंचन योजनेंतर्गतचे अनुदान शेतकर्‍यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून माजी जिल्हा परिषद सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे व भारिप-बमसंचे नेते युसूफ पुंजानी यांनी शनिवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाला निवेदन दिले. मानोरा तालुका व जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असतानाच, शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाने शेतकर्‍यांना हवालदिल केले आहे. कमी पावसातही शेतकरी तुषार किंवा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेती ओलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अनुदान मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचा आरोप हेमेंद्र ठाकरे व युसूफ पुंजानी यांनी केला. मानोरा तालुक्यातील लाभार्थींंनी उसणवारीवर सिंचनाची सुविधा उपलब्ध केली आहे. आता सिंचन साहित्याचे अनुदान मिळत नसल्याने उसणवारीची परतफेड कशी करावी? या प्रश्नाने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. शासनकर्त्यांंनी शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा हेमेंद्र ठाकरे व युसूफ पुंजानी यांनी दिला.