शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

पावसाचा अन् नळाला येणाऱ्या पाण्याचा काही संबंध असतो का रे भाऊ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST

यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या सुरुवातीपर्यंतही अपेक्षित पाऊस न पडल्याने प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली होती. तथापि, १० जुलैपासून पावसाने जिल्ह्यात धडाकाच ...

यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या सुरुवातीपर्यंतही अपेक्षित पाऊस न पडल्याने प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली होती. तथापि, १० जुलैपासून पावसाने जिल्ह्यात धडाकाच सुरू केला आहे. या पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीला मात्र मोठा आधार मिळाला असून, जिल्ह्यातील १३७ प्रकल्पांपैकी ३३ लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर सर्व प्रकल्पांतील पातळीची सरासरी ५८ टक्के झाली आहे. यामुळे संबंधित प्रकल्पाच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

--------------

एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्के साठा, शहराची पाणीटंचाई नियंत्रित

१) वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्क्यांवर जलसाठा झाला आहे.

२) प्रकल्पाची पातळी वाढल्यामुळे वाशिम शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या मिटली आहे.

३) शहराला दर तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे.

------------------

जिल्ह्यात झालेला पाऊस (मि.मी.)

तालुका - अपेक्षित - प्रत्यक्षात - टक्केवारी

वाशिम - ४६३.१ ५३१.५ -११४.८

मालेगाव - ४१७.९ ५५०.४ -१३१.७

रिसोड - ४०४.६ ५३३.५ -१३१.९

मंगरुळ - ३६५.९ ६३७.५ -१७४.२

मानोरा - ३७३.३ ५९३.६ -१५९.०

कारंजा - ४०६.६ ३९७.२ - ९७.७

------------------

धरणांतील साठा (दलघमी)

प्रकल्प - संख्या - उपयुक्त - टक्केवारी

मोठे - ०० - ०० - ००

मध्यम - ०३ - ४२.८३ - ६३.६९

लघु - १३४ - २०३.२४१ - ५६.१८

-----------------------------------

बॉक्स: शहरवासीय म्हणतात पाणीटंचाईपासून दिलासा

१) कोट :

यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. त्यात वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पात आता ९२ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे पूर्वी आठ दिवसांत होणारा पाणीपुरवठा आता तिसऱ्या दिवशी होत असल्याने पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे.

-सतीश सांगळे,

नागरिक, वाशिम

-----------

२) कोट :

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्के जलसाठा झाला आहे. या प्रकल्पातील साठा वाढल्याने पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळाला आहे. दर तिसऱ्या दिवशी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पूर्वी आठवड्यातून एकदाच नळाला पाणी यायचे.

-सागर हवालदार,

नागरिक, वाशिम

--------

बॉक्स: बळीराजा आनंदला

१) कोट:

जून महिन्याच्या अखेरपासून दडी मारणाऱ्या पावसाने जुलैच्या मध्यंतरापासून दमदार एन्ट्री केली. त्यामुळे बहुतांश प्रकल्पाची पातळी वाढली. आता यंदा रब्बी हंगामात सिंचनासाठी आम्हांला पाणी मिळू शकेल, असा विश्वास आहे.

- नितीन पाटील उपाध्ये,

शेतकरी , काजळेश्वर,

----------

२) कोट:

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली होती. प्रकल्पांच्या पातळीत किचिंतही वाढ न झाल्यामुळे सिंचनासाठी पाणी मिळणार की नाही, अशी शंका वाटत होती; परंतु जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यानंतरच पावसाने दमदार हजेरी लावणे सुरू केल्याने प्रकल्पांची पातळी वाढली.

-नंदकिशोर तोतला,

शेतकरी, इंझोरी