शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

पावसाचा अन् नळाला येणाऱ्या पाण्याचा काही संबंध असतो का रे भाऊ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST

यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या सुरुवातीपर्यंतही अपेक्षित पाऊस न पडल्याने प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली होती. तथापि, १० जुलैपासून पावसाने जिल्ह्यात धडाकाच ...

यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या सुरुवातीपर्यंतही अपेक्षित पाऊस न पडल्याने प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली होती. तथापि, १० जुलैपासून पावसाने जिल्ह्यात धडाकाच सुरू केला आहे. या पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीला मात्र मोठा आधार मिळाला असून, जिल्ह्यातील १३७ प्रकल्पांपैकी ३३ लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर सर्व प्रकल्पांतील पातळीची सरासरी ५८ टक्के झाली आहे. यामुळे संबंधित प्रकल्पाच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

--------------

एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्के साठा, शहराची पाणीटंचाई नियंत्रित

१) वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्क्यांवर जलसाठा झाला आहे.

२) प्रकल्पाची पातळी वाढल्यामुळे वाशिम शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या मिटली आहे.

३) शहराला दर तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे.

------------------

जिल्ह्यात झालेला पाऊस (मि.मी.)

तालुका - अपेक्षित - प्रत्यक्षात - टक्केवारी

वाशिम - ४६३.१ ५३१.५ -११४.८

मालेगाव - ४१७.९ ५५०.४ -१३१.७

रिसोड - ४०४.६ ५३३.५ -१३१.९

मंगरुळ - ३६५.९ ६३७.५ -१७४.२

मानोरा - ३७३.३ ५९३.६ -१५९.०

कारंजा - ४०६.६ ३९७.२ - ९७.७

------------------

धरणांतील साठा (दलघमी)

प्रकल्प - संख्या - उपयुक्त - टक्केवारी

मोठे - ०० - ०० - ००

मध्यम - ०३ - ४२.८३ - ६३.६९

लघु - १३४ - २०३.२४१ - ५६.१८

-----------------------------------

बॉक्स: शहरवासीय म्हणतात पाणीटंचाईपासून दिलासा

१) कोट :

यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. त्यात वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पात आता ९२ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे पूर्वी आठ दिवसांत होणारा पाणीपुरवठा आता तिसऱ्या दिवशी होत असल्याने पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे.

-सतीश सांगळे,

नागरिक, वाशिम

-----------

२) कोट :

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्के जलसाठा झाला आहे. या प्रकल्पातील साठा वाढल्याने पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळाला आहे. दर तिसऱ्या दिवशी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पूर्वी आठवड्यातून एकदाच नळाला पाणी यायचे.

-सागर हवालदार,

नागरिक, वाशिम

--------

बॉक्स: बळीराजा आनंदला

१) कोट:

जून महिन्याच्या अखेरपासून दडी मारणाऱ्या पावसाने जुलैच्या मध्यंतरापासून दमदार एन्ट्री केली. त्यामुळे बहुतांश प्रकल्पाची पातळी वाढली. आता यंदा रब्बी हंगामात सिंचनासाठी आम्हांला पाणी मिळू शकेल, असा विश्वास आहे.

- नितीन पाटील उपाध्ये,

शेतकरी , काजळेश्वर,

----------

२) कोट:

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली होती. प्रकल्पांच्या पातळीत किचिंतही वाढ न झाल्यामुळे सिंचनासाठी पाणी मिळणार की नाही, अशी शंका वाटत होती; परंतु जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यानंतरच पावसाने दमदार हजेरी लावणे सुरू केल्याने प्रकल्पांची पातळी वाढली.

-नंदकिशोर तोतला,

शेतकरी, इंझोरी