शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST

वाशिम : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत अंतिम मुदतीपर्यंत ...

वाशिम : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील १४२६९७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. जाचक अटी असल्याचे कारण समोर करून बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याने कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का? असा संतप्त सवालही शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

०००००००००००००

जिल्ह्यातील एकूण शेतकरी २७७२४२

पीकविमा काढलेले शेतकरी

गतवर्षी २७२५९७

यावर्षी १४२६९७

००००००००००००

एकूण खरीप क्षेत्र ४०६२३४

सोयाबीन ३००४१७

कपाशी १९२४५

तूर ५४५०९

मूग ९१०२

उडीद १०१७९

ज्वारी ८२७२

००००००००००००००

यंदा केवळ ५१ टक्के पीकविमा

१) गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना विमा काढून पीक नुकसानीची भरपाई मिळाली नाही.

२) जाचक अटी व दिरंगाई यामुळे यंदा शेतकऱ्यांना पीकविमा योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

३) यंदा २७७२४२ पैकी १४२६९७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला असून, याची टक्केवारी ५१ अशी येते.

०००००००

गतवर्षीचा अनुभव वाईट

गेल्यावर्षी खरीप हंगामात पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने ४८ तासांच्या आत संबंधितांना माहिती देण्यात आली होती. सर्वेक्षणही झाले. परंतु, नुकसानभरपाई मिळाली नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा? असा प्रश्न आहे. जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.

- गौतम भगत, शेतकरी

०००००

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीकविमा उतरविण्यात येतो. गेल्यावर्षी विमा उतरविण्यात आला होता. पंचनामेही करण्यात आले होते; परंतु नुकसानभरपाई मिळालेली नाही. याबाबत कृषी विभागाकडे पाठपुरावाही केला होता. नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

- टी. एम. सरकटे, शेतकरी

००००००००००००

नुकसानभरपाई मिळावी याकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पिकांना संरक्षण देण्यात येते. पीकविमा योजनेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. गेल्यावर्षी खरीप हंगामात २७२५९७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यंदा जिल्ह्यातील १ लाख ४२ हजारांवर शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे.

- शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.