शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST

वाशिम : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत अंतिम मुदतीपर्यंत ...

वाशिम : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील १४२६९७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. जाचक अटी असल्याचे कारण समोर करून बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याने कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का? असा संतप्त सवालही शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

०००००००००००००

जिल्ह्यातील एकूण शेतकरी २७७२४२

पीकविमा काढलेले शेतकरी

गतवर्षी २७२५९७

यावर्षी १४२६९७

००००००००००००

एकूण खरीप क्षेत्र ४०६२३४

सोयाबीन ३००४१७

कपाशी १९२४५

तूर ५४५०९

मूग ९१०२

उडीद १०१७९

ज्वारी ८२७२

००००००००००००००

यंदा केवळ ५१ टक्के पीकविमा

१) गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना विमा काढून पीक नुकसानीची भरपाई मिळाली नाही.

२) जाचक अटी व दिरंगाई यामुळे यंदा शेतकऱ्यांना पीकविमा योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

३) यंदा २७७२४२ पैकी १४२६९७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला असून, याची टक्केवारी ५१ अशी येते.

०००००००

गतवर्षीचा अनुभव वाईट

गेल्यावर्षी खरीप हंगामात पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने ४८ तासांच्या आत संबंधितांना माहिती देण्यात आली होती. सर्वेक्षणही झाले. परंतु, नुकसानभरपाई मिळाली नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा? असा प्रश्न आहे. जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.

- गौतम भगत, शेतकरी

०००००

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीकविमा उतरविण्यात येतो. गेल्यावर्षी विमा उतरविण्यात आला होता. पंचनामेही करण्यात आले होते; परंतु नुकसानभरपाई मिळालेली नाही. याबाबत कृषी विभागाकडे पाठपुरावाही केला होता. नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

- टी. एम. सरकटे, शेतकरी

००००००००००००

नुकसानभरपाई मिळावी याकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पिकांना संरक्षण देण्यात येते. पीकविमा योजनेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. गेल्यावर्षी खरीप हंगामात २७२५९७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यंदा जिल्ह्यातील १ लाख ४२ हजारांवर शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे.

- शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.