शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST

वाशिम : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत अंतिम मुदतीपर्यंत ...

वाशिम : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील १४२६९७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. जाचक अटी असल्याचे कारण समोर करून बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याने कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का? असा संतप्त सवालही शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

०००००००००००००

जिल्ह्यातील एकूण शेतकरी २७७२४२

पीकविमा काढलेले शेतकरी

गतवर्षी २७२५९७

यावर्षी १४२६९७

००००००००००००

एकूण खरीप क्षेत्र ४०६२३४

सोयाबीन ३००४१७

कपाशी १९२४५

तूर ५४५०९

मूग ९१०२

उडीद १०१७९

ज्वारी ८२७२

००००००००००००००

यंदा केवळ ५१ टक्के पीकविमा

१) गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना विमा काढून पीक नुकसानीची भरपाई मिळाली नाही.

२) जाचक अटी व दिरंगाई यामुळे यंदा शेतकऱ्यांना पीकविमा योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

३) यंदा २७७२४२ पैकी १४२६९७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला असून, याची टक्केवारी ५१ अशी येते.

०००००००

गतवर्षीचा अनुभव वाईट

गेल्यावर्षी खरीप हंगामात पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने ४८ तासांच्या आत संबंधितांना माहिती देण्यात आली होती. सर्वेक्षणही झाले. परंतु, नुकसानभरपाई मिळाली नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा? असा प्रश्न आहे. जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.

- गौतम भगत, शेतकरी

०००००

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीकविमा उतरविण्यात येतो. गेल्यावर्षी विमा उतरविण्यात आला होता. पंचनामेही करण्यात आले होते; परंतु नुकसानभरपाई मिळालेली नाही. याबाबत कृषी विभागाकडे पाठपुरावाही केला होता. नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

- टी. एम. सरकटे, शेतकरी

००००००००००००

नुकसानभरपाई मिळावी याकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पिकांना संरक्षण देण्यात येते. पीकविमा योजनेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. गेल्यावर्षी खरीप हंगामात २७२५९७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यंदा जिल्ह्यातील १ लाख ४२ हजारांवर शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे.

- शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.