शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
3
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
4
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
5
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
6
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
7
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
8
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
9
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
10
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
11
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
12
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
13
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
14
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
15
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
16
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
17
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
18
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
19
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना

रासायनिक शेती करण्यापेक्षा सेंद्रिय शेती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:18 IST

रासायनिक शेतीमुळे शेतीचे उत्पन्न वाढत नाही, सेंद्रिय शेतीमुळे जमीन कस धरुन राहते. रासायनिक खतामुळे शेतीचा पोत खराब होतो. त्यामुळे ...

रासायनिक शेतीमुळे शेतीचे उत्पन्न वाढत नाही, सेंद्रिय शेतीमुळे जमीन कस धरुन राहते. रासायनिक खतामुळे शेतीचा पोत खराब होतो. त्यामुळे कास्तकारांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेती करा. त्यामुळे आपले पैसे वाचतात. शेतीचा पोत चांगला जोमदार होण्यासाठी आवश्यक आहे. पेरणीच्या वेळेस पेरणी करतेवेळी पेरणी सोबत रासानिक खताऐवजी गांडूळ खत एकरी कमीतकमी ७५ किलो द्या. त्यामुळे शेतातल्या जिवाणूला भरपूर प्रमाणात द्रव्ये मिळून जास्त प्रमाणात उत्पन मिळते. कपाशीसाठी १५ ते १८ दिवसात पुन्हा खत देणे गरजेचे आहे. तिथून चौथ्या दिवशी फवारणी करणे आवश्यक आहे. फवारणी करतेवेळी शक्यतो जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करा, कारण की फवारणीमुळे भरपूर प्रमाणात पिकाची वाढ होते. फवारणी करतेवेळी लिंबोळी अर्काची फवारणी करा. आपल्या भागामध्ये लिंबाची झाडे भरपूर प्रमाणात आहेत , त्यामुळे कास्तकारांनी येत्या दोन महिन्यात झाडाला भरपूर प्रमाणात लिंबोळी येतात त्या लिंबोळ्या जमा करून ५० टक्के लिंबोळी म्हणजे ६ किलो लिंबोळी व हिंग १०० ग्रॅम बारीक करून ९ लिटर गोमूत्रामध्ये टाकून आठ दिवस प्लास्टिक किंवा मातीच्या भांड्यात ठेवणे, नंतर सूती कपड्याने गाळून १५ लिटर पाण्यामध्ये ५०० मिली टाकणे त्यामधे ३० पंप होतात. ही फवारणी सोयाबीन पिकासाठी चांगली आहे ,अनेकांच्या शेतामध्ये तुरीला उधळी लागते ते कमी करण्यासाठी लिंबाचा पालापाचोळा जमा करुन पेरणीच्या १५ दिवस आधी पालापाचोळा ४० किलो शेतात टाकल्यामुळे उधळी कमी प्रमाणात लागते. नांगरणी शक्यतो लवकर करणे गरजेचे आहे त्यामुळे बुरशीचे प्रमाण कमी होते.अशी माहिती प्रगतशील शेतकरी मुंगसीराम उपाधे यांनी शेतकऱ्यांना दिली.