शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

रासायनिक शेती करण्यापेक्षा सेंद्रिय शेती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:18 IST

रासायनिक शेतीमुळे शेतीचे उत्पन्न वाढत नाही, सेंद्रिय शेतीमुळे जमीन कस धरुन राहते. रासायनिक खतामुळे शेतीचा पोत खराब होतो. त्यामुळे ...

रासायनिक शेतीमुळे शेतीचे उत्पन्न वाढत नाही, सेंद्रिय शेतीमुळे जमीन कस धरुन राहते. रासायनिक खतामुळे शेतीचा पोत खराब होतो. त्यामुळे कास्तकारांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेती करा. त्यामुळे आपले पैसे वाचतात. शेतीचा पोत चांगला जोमदार होण्यासाठी आवश्यक आहे. पेरणीच्या वेळेस पेरणी करतेवेळी पेरणी सोबत रासानिक खताऐवजी गांडूळ खत एकरी कमीतकमी ७५ किलो द्या. त्यामुळे शेतातल्या जिवाणूला भरपूर प्रमाणात द्रव्ये मिळून जास्त प्रमाणात उत्पन मिळते. कपाशीसाठी १५ ते १८ दिवसात पुन्हा खत देणे गरजेचे आहे. तिथून चौथ्या दिवशी फवारणी करणे आवश्यक आहे. फवारणी करतेवेळी शक्यतो जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करा, कारण की फवारणीमुळे भरपूर प्रमाणात पिकाची वाढ होते. फवारणी करतेवेळी लिंबोळी अर्काची फवारणी करा. आपल्या भागामध्ये लिंबाची झाडे भरपूर प्रमाणात आहेत , त्यामुळे कास्तकारांनी येत्या दोन महिन्यात झाडाला भरपूर प्रमाणात लिंबोळी येतात त्या लिंबोळ्या जमा करून ५० टक्के लिंबोळी म्हणजे ६ किलो लिंबोळी व हिंग १०० ग्रॅम बारीक करून ९ लिटर गोमूत्रामध्ये टाकून आठ दिवस प्लास्टिक किंवा मातीच्या भांड्यात ठेवणे, नंतर सूती कपड्याने गाळून १५ लिटर पाण्यामध्ये ५०० मिली टाकणे त्यामधे ३० पंप होतात. ही फवारणी सोयाबीन पिकासाठी चांगली आहे ,अनेकांच्या शेतामध्ये तुरीला उधळी लागते ते कमी करण्यासाठी लिंबाचा पालापाचोळा जमा करुन पेरणीच्या १५ दिवस आधी पालापाचोळा ४० किलो शेतात टाकल्यामुळे उधळी कमी प्रमाणात लागते. नांगरणी शक्यतो लवकर करणे गरजेचे आहे त्यामुळे बुरशीचे प्रमाण कमी होते.अशी माहिती प्रगतशील शेतकरी मुंगसीराम उपाधे यांनी शेतकऱ्यांना दिली.