शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी देणाºया गावालाच मिळत नाही धरणाचे पाणी!

By admin | Updated: April 10, 2017 13:37 IST

प्रकल्पात पाणी असतानाही दरवर्षी अख्ख्या गावाला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

बोराळा (वाशिम) - गावशिवारात लघूप्रकल्प उभा होणार असल्याने शेती सिंचनाखाली येईल, बारमाही पिके घेता येतील आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकाली निघेल, अशी आशा ठेवून प्रकल्पासाठी गावकऱ्यांनी जमिनी दिल्या. मात्र, प्रकल्पात पाणी असतानाही दरवर्षी अख्ख्या गावाला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बोराळावासीयांचे हे दुखणे कोण समजून घेणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.मालेगाव तालुक्यातील बोराळा येथे सन १९८९ मध्ये उभारण्यात आलेल्या लघूप्रकल्पामध्ये गावकऱ्यांनी १०० एकर जमिन दिली. त्याबदल्यात त्यांना तुटपूंजा मोबदला मिळाला. त्यामुळे गावातील अनेक शेतकरी अल्पभूधारक, भूमिहिन झाले. गावातील ७० टक्के घरे आजही कच्चा स्वरूपातील असून पावसाळ्यात अनेकांना अतोनात त्रास सोसावा लागतो. गावाशेजारी धरण उभे होवून २५ ते ३० वर्षाचा मोठा कालावधी उलटला; पण आजपर्यंत धरणाचे पाणी गावकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे गावातील एका छोट्याश्या विहिरीव्दारे मिळणाऱ्या पाण्यावरच गावकऱ्यांना विसंबून राहावे लागत आहे.