शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारण निधीबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 03:01 IST

पीक विमा काढलेले शेतकरी वगळले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाशिम, दि. 0२- दुष्काळ निवारण निधी म्हणून केंद्र शासनाने राज्याला १२00 कोटी रुपये मंजूर केले असून, यासाठी पात्र ठरणार्‍या जिल्ह्यांमध्ये वाशिमचाही समावेश आहे. मात्र, याअंतर्गत जिल्ह्याच्या वाट्याला किती निधी येणार? पीक विमा भरणारे शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरतील का? नेमके निकष इतरही प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.सन २0१५-१६ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये नजिकच्या हिंगोली आणि बुलडाणा जिल्ह्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली. मात्र, जिल्हा प्रशासानाच्या उदासीन धोरणामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पिकाच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहिले. अशातच आता पुन्हा केंद्र शासनाने राज्याला मदत व पुनर्वसन योजनेंतर्गत १२00 कोटी रुपये देऊ केले आहेत. त्यात वाशिम जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला. मात्र, या प्रकरणी शासन-प्रशासन पातळीवरून अद्याप कुठलीच ठोस हालचाल झालेली नाही. जिल्हा प्रशासनालाही यासंबंधी कुठलेच दिशानिर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांसोबतच प्रशासनही संभ्रमात सापडले आहे.विमा न काढणार्‍या शेतक-यांना लाभ..गतवर्षी पिकांच्या नुकसानभरपाईपोटी विमा लागू झालेले तद्वतच चालूवर्षी पीक विमा योजनेत सहभागी शेतकर्‍यांना दुष्काळ निवारण निधीतून ह्यछदामह्णही मिळणार नाही. पीक विमा न काढणार्‍या शेतकर्‍यांना मात्र या निधीतून आर्थिक मदत केली जाणार आहे, अशी माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली. दरम्यान, याबाबत राज्य शासनाचे दिशानिर्देश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. मात्र, पीक विमा न काढणार्‍या शेतकर्‍यांना मदत मिळाल्यास ही रक्कम ३८ कोटी ३८ लाख रुपये असून, यासंदर्भात शासनाला यापूर्वीच कळविण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.केंद्र शासनाकडून दुष्काळ निवारण मदतनिधी म्हणून राज्याला १२00 कोटी रुपयांचा निधी मिळाला. मात्र, यासंदर्भात शासनाचे अद्याप कुठलेच दिशानिर्देश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. पीक विमा न काढणार्‍या शेतकर्‍यांना ३८ कोटी ३८ लाख रुपये मदतीची आवश्यकता असल्याचा अहवाल शासनाकडे पाठविलेला आहे.- राहुल द्विवेदीजिल्हाधिकारी, वाशिम