शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

जलसुरक्षकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा

By admin | Updated: March 19, 2016 01:10 IST

स्वच्छता व जलजागृती सप्ताह अंतर्गत जलसंवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

वाशिम: जलसुरक्षक हे पाण्याचे संरक्षक असून, गावाला शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी त्यांची आहे. यासाठी लोकांनीही आपला सहभाग देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केले. स्वच्छता व जलजागृती सप्ताह अंतर्गत जिजाऊ सभागृहात गुरुवारी आयोजित जलसुरक्षकांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, वरिष्ठ भूवैज्ञानिक बलवंत गजभिये, साथरोग तज्ज्ञ कल्पना उरकडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शेगावकर, उपअभियंता बेले, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे विजय गवळी आदींची यावेळी उपस्थिती होती. जलसुरक्षकांनी पाण्याची शुद्धता राखण्याचे काम प्रामाणिकपणे करून या क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे, असा सल्लाही पाटील यांनी दिला. प्रास्ताविक महेश पाटील यांनी केले. यावेळी सेलोकार, गजभिये, कल्पना उरकडे, शेगावकर, बेले, शंकर आंबेकर, विवेक राजूरकर यांनीही जलसुरक्षकांना मार्गदर्शन केले. पिंपळखुटा येथील जलमित्र उजेंद्र परंडे यांनीही आपल्या अनुभवांच्या आधारे विचार व्यक्त केले. संचालन पुष्पलता अफुने यांनी केले. आभार अभिजित दुधाटे यांनी मानले.