शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

लाभार्थ्यांना धान्याचे वेळेत वाटप करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:07 IST

वाशिम : सध्याचा काळ कोरोना संसर्गाचा आहे. या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून करण्यात येणारे ...

वाशिम : सध्याचा काळ कोरोना संसर्गाचा आहे. या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून करण्यात येणारे धान्याचे वाटप हे वेळेत झाले पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शनिवारी पार पडलेल्या जिल्‍हा दक्षता समितीची सभेत दिले.

सभेला जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील विंचनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानातून लाभार्थ्यांना मिळणारे धान्य हे वेळेत आणि नियमाप्रमाणे उपलब्ध झाले पाहिजे. कोणत्याही लाभार्थ्यांना धान्य मिळाले नाही, अशी तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. राज्य शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्याला अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे धान्य मोफत वितरित करण्यात यावे. केंद्र सरकारच्या योजनेतील धान्याचे वितरणसुद्धा लाभार्थ्यांना वेळेत वितरण झाले पाहिजे. शिवभोजन योजनेंतर्गत जिल्ह्यात मोफत थाळीचे वितरण गरजू आणि गरिबांना केले पाहिजे. जे लाभार्थी कोरोना बाधित आहेत, त्यांचे धान्य घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात यावी.’’

जिल्हा पुरवठा अधिकारी विंचनकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ७७६ रास्त भाव दुकाने आहेत. यापैकी १२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. रद्द करण्यात आलेल्या दुकानांच्या लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका जवळच्या रास्त भाव दुकानाला जोडण्यात आल्यामुळे कोणताही लाभार्थी हा धान्यापासून वंचित नाही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेचे ४८ हजार २९३ कार्डधारक आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील १ लाख ७७ हजार ६२७ कार्डधारक अशा एकूण २ लाख २५ हजार ९२० कार्डधारकांना ५५ हजार ६९० क्विंटल गहू आणि तांदूळ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून २ लाख २५ हजार ९२० कार्डधारकांना ४९ हजार ५०० क्विंटल धान्य मे आणि जून महिन्यात मोफत वितरित केले जाणार आहे.’’