शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

महायुतीच्या मनोमिलनाची विण ढिलीच!

By admin | Updated: October 8, 2014 00:36 IST

वाशिम जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा वेध.

वाशिम : शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाने चाणक्यनितीचा अवलंब करून स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं व शिवसंग्राम या पक्षांची मोट बांधत महायुती जन्माला घातली. मतांचा जोगवा मागण्यासाठी होणार्‍या सभांमध्येही महायुतीचे वरिष्ठ नेते गळ्यात गळे घालून वावरताना दिसतात. मात्र, स्थानिक पातळीवर अद्यापही महायुतीमधील मित्र पक्षांच्या मनोमिलनाची वीण अद्याप ढिलीच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील रिसोड व कारंजा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराने ही बाब अधोरेखित केली आहे.राज्यात सन १९९0 मध्ये शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीची मुहुर्तमेढ रोवली गेली होती. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व भारतीय जनता पक्षाचे नेते दिवंगत प्रमोद महाजन व दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा युतीच्या गठणात सिंहाचा वाटा होता. यंदा मात्र, दोन्ही पक्षातील नेत्यांच्या सत्तेच्या हव्यासापोटी २५ वर्षापासून अस्तीत्वात असलेल्या युतीचा घटस्फोट झाला आहे. परिणामी, दोन्ही पक्षांनी आपल्या पैलवानांना स्वबळाचे तेल लावून विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती तुटली असली तरी भाजपने चाणक्यनितीचा अवलंब करीत महायुतीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं व शिवसंग्राम या छोट्या पक्षांना आपल्या दावणीला बांधून ठेवण्यात यश मिळविले. वेगवेगळ्या समाज घटकांशी ऋणाणुबंध जपणारे हे मित्र पक्ष जोडून भाजपने राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग अवलंबिला आहे. ह्यशिवछत्रपतींचा आशिर्वाद, चला देऊ मोदींना साथह्ण म्हणत महायुतीचे राज्यातील सर्व शिलेदार गळ्यात गळे घालत मतदारांना मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर या नेत्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत सभा होत आहेत. सभेच्या ठिकाणानुसार त्या- त्या घटक पक्षांचे नेते नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावरही उपस्थिती लावत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर प्रचार करताना ज्या पक्षाला तिकीट दिले, त्या पक्षाचे कार्यकर्ते आघाडीवर व घटक पक्ष बॅकफुटवर असे चित्र प्रत्येक मतदारसंघात दिसत आहे.रिसोड व कारंजा मतदारसंघात ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. जागा वाटपाच्या गुर्‍हाळानंतर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामसाठी रिसोड मतदारसंघ सोडण्यात आल्याची चर्चा शिवसंग्रामसह भाजपच्याही गोटात होती. एवढेच नव्हेतर शिवसंग्रामने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप जाधव यांना आपल्या गोटात खेचून वातावरण निर्मितीही सुरू केली होती. जाधव यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. तसेच विष्णुपंत भुतेकर हेही शिवसंग्रामकडून निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. निवडणूक अर्ज भरण्याच्यादिवशीसुध्दा ते सोबत होते. मात्र अचानक हा मतदारसंघ शिवसंग्रामऐवजी भारतीय जनता पक्षासाठी सोडण्यात आला. भाजपने माजी आमदार विजय जाधव यांना येथून रिंगणात उतरिवले. त्यामुळे स्वाभाविकच शिवसंग्रामच्या इच्छुकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे फर्मान आले.