उंबर्डाबाजार(वाशिम): येथील सुभाष शामराव हळदे नामक ४२ वर्षीय इसमाने आजाराला कंटाून विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना २४ मे रोजी उघडकीस आली. सुभाष हळदे हे मागील अनेक महिन्यापासून विविध आजाराने त्रस्त होते. त्यातच त्यांनी २३ मे च्या रात्री साडे तीन वाजताच्या सुमारास बैल बाजारातील विहीरीत उडी घेवून जीवनयात्रा संपविली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आजाराला कंटाळून जीवनयात्रा संपविली
By admin | Updated: May 25, 2014 00:07 IST