शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

महाविकास आघाडीत चर्चेचे गुऱ्हाळ कायम; इच्छुक संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 11:46 IST

Discussions in Mahavikas Aghadi continue: सत्ताधारी पक्षाचे उमेदवार एकमेकांविरूद्ध दंड थोपटून निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने दोन सदस्यांना डच्चू देत अन्य उमेदवाराला पसंती देत रणनितीचे घाेडे पुढे दामटले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन जानेवारी २०२० मध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. आता पोटनिवडणूक लागल्याने सत्ताधारी पक्षाचे उमेदवार एकमेकांविरूद्ध दंड थोपटून निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.माजी खासदार अनंतराव देशमुख आणि माजी खासदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत जनविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या युतीचे उमेदवार आखाड्यात उतरवून प्रमुख पक्षांसमोर आव्हान निर्माण केले. जनविकास व वंचित बहुजन आघाडीचे आव्हान परतवून लावण्यासाठी राकाँ, काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी  स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीबाबत बैठका घेतल्या. परंतु, जागा वाटपावरून अद्यापही तोडगा निघाला नसून, चर्चेभोवतीच आघाडी फिरत असल्याने तिन्ही पक्षाचे इच्छुक उमेदवारही संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.राकॉं, सेना, कॉंग्रेसचे उमेदवार जैसे थे;         वंचित बहुजन आघाडीने ४ उमेदवार बदलले !वंचित बहुजन आघाडीने जानेवारी २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत पांगरी नवघरे आणि उकळीपेन या गटातून विजयी झालेले रत्नमाला उंडाळ व चरण गोटे या दोन सदस्यांना वगळून पोटनिवडणुकीत अन्य उमेदवारांना पसंती दिली आहे. जऊळका रेल्वे व जोडगव्हाण या दोन पंचायत समिती गणातून गतवेळी विजयी झालेल्या उमेदवारांना वगळून यावेळी अन्य उमेदवारांना उमेदवारी बहाल केली. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना व जनविकास आघाडीने गतवेळी विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना पोटनिवडणुकीच्या मैदानात पुन्हा उतरविले आहे.

एकमेकांविरूद्ध      अर्ज दाखल !महाविकास आघाडीत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने जि.प. गट व पं.स. गणात तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विश्वसनीय सूत्रांनुसार महाविकास आघाडीची शक्यता मावळली असून, या तिन्ही पक्षांचे उमेदवार स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करून आपापल्या सर्कलमध्ये प्रचारही सुरू केल्याची माहिती आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारणElectionनिवडणूक