शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

जिल्ह्यातील बॅरेजसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:39 IST

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संसदेच्या अधिवेशनपूर्व झालेल्या बैठकीत खासदार गवळी यांनी हा प्रश्‍न मांडला होता. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे ...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संसदेच्या अधिवेशनपूर्व झालेल्या बैठकीत खासदार गवळी यांनी हा प्रश्‍न मांडला होता. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने ८ एप्रिल रोजी नामदार जयंत पाटील यांनी खासदार भावना गवळी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील बॅरेजेसचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या गोदावरी खोऱ्यातील पैनगंगा उपखोऱ्यातील मंगरूळपीर तालुक्यामधील अडाण नदीवरील घोटा शिवणी, बोरव्हा व सत्तरसावंगा बॅरेज या तिन्ही बॅरेजेसना पाणी उपलब्ध झाल्यानंतर २००८-०९ मध्ये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती परंतु निधीअभावी सदरच्या बॅरेजेसच्या प्रकल्पांची कामे सुरू करता आली नाहीत. ही तिन्ही बॅरेजेस या परिसरातील शेतकऱ्यांना संजीवनी ठरणार असल्यामुळे खा. गवळी यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये या तीनही बॅरेजेसला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधी मंजूर करण्याविषयी निर्णय झाला असून घोटा शिवणी, बोरव्हा व सत्तरसावंगा बॅरेजेसला निधी उपलब्धतेकरिता वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याची माहिती खासदार गवळी यांनी दिली आहे. हे तीनही बॅरेजेस काम आता पूर्णत्वाकडे जाऊन मंगरूळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून हा भाग सुजलाम् सुफलाम् होणार आहे. तसेच रिसोड तालुक्यामधून वाहत असलेल्या पैनगंगा नदीवर कार्यान्वित असलेल्या बाळखेडा, भापूर, धोडप, मसलापेन, आसेगाव पेन, येवती या सहा कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर व्हावे याकरिता या परिसरातील शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांपासून मागणी आता पूर्ण होत आहे. वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढल्यानंतर वाशिमकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटून नळगंगा व वैनगंगा या नदीजोड प्रकल्पांच्या पेनटाकळी प्रकल्पातून पाणी घेतल्यामुळे येथील बॅरेजेसवरील शेतकऱ्यांनाही पाण्याची कमतरता भासणार नाही. वाशिम जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे ४८ प्रकल्प असून त्यापैकी १२ प्रकल्प हे अपूर्णावस्थेत आहेत. यावरही चर्चा झाली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार, लाभक्षेत्र विकास जलसंपदा विभागाचे व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.