शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

१५२ गावांच्या सुरक्षेसाठी ‘आपत्ती व्यवस्थापन’ सज्ज!

By admin | Updated: May 22, 2017 01:24 IST

मान्सूनपूर्व तयारी अंतिम टप्प्यात : अतिवृष्टी, पूर परिस्थितीपासून बचावाकरिता सात सुरक्षा पथक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच तथा अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभाग कामाला लागला असून, मान्सूनपूर्व तयारी पूर्ण करीत अतिवृष्टी, पूर परिस्थितीने बाधित होऊ शकणाऱ्या जिल्ह्यातील १५२ गावांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.यासंदर्भात अधिक माहिती देताना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांनी सांगितले, की जिल्ह्यात सहा तालुक्यात सहा आणि जिल्हा पातळीवर एक, असे सात शोध व बचाव पथक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय वाशिम येथील छत्रपती बहूद्देशीय तरुण मित्र मंडळ, या दोन सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहणार आहेत. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीदरम्यान बचाव कार्यासाठी दोन रबर बोटदेखील तैनात राहणार आहेत, अशी माहिती बोराडे यांनी दिली. अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास जिल्ह्यातील पेनबोरी, बाळखेड, चिचांबाभर (ता. रिसोड), उकळीपेन (ता. वाशिम) आणि बोरव्हा खुर्द (ता. मंगरूळपीर) ही पाच गावे बाधित होतात. त्यापैकी बोरव्हा खुर्द या गावाचा तीन बाजूने संपर्क तुटतो. त्यादृष्टीने सदर पाचही गावांमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या उपाययोजनांची तयारी पूर्ण झालेली आहे. दोन ते तीन दिवस सलग पाऊस सुरू राहिल्यास, अतिवृष्टी झाल्यास पेनटाकळी धरणाचे पाणी सोडण्यात आल्यास किंवा जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या ‘ओव्हरफ्लो’ झाल्यास १५२ गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, त्या दृष्टीनेही शोध व बचावकार्याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, गावागावातील नागरिकांना प्रत्यक्ष स्वत:च्या बचावासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत, अशी माहिती बोराडे यांनी दिली.