शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

रिसोड तहसीलवर धनगर समाजाचा मोर्चा

By admin | Updated: August 1, 2014 02:19 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्या या मागणीकरिता धनगर समाजाचा मोर्चा.

रिसोड : आर्थिक स्तर उंचावण्यासाठी राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यात याव्यात, या मागणीकरिता तालुका धनगर समाज आरक्षण हक्क कृती समिती आणि समाज बांधवांचा मोर्चा ३१ जुलै रोजी तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चात धनगर समाज बांधवांसह महिला व युवक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा आसनगल्ली, शिवाजी चौक, गुजरी चौक, आंबेडकर चौक, सिव्हिल लाईन, पोस्ट ऑफिस चौक मार्गे तहसील कार्यालयात काढण्यात आला. या मोर्चात धनगर समाजाचे शेकडो युवक, पुरुष, महिला सहभागी होत्या. आघाडी शासनाविरोधात विविध प्रकारच्या घोषणाबाजी करुन मोर्चेकर्‍यांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले होते. साडेबाराच्या दरम्यान मोर्चा तहसील कार्यालयावर धडकताच मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी आरक्षण हक्क कृती समितीच्या बहुतांश पदाधिकार्‍यांनी आघाडी शासनाचा निषेध करीत मोर्चाला मार्गदर्शन केले. तद्वतच तहसीलदार अमोल कुंभार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भारतीय राज्यघटनेने सर्वांना जगण्याचा व प्रगती करण्याचा समान अधिकार बहाल केला आहे; परंतु शासनाच्या एका चुकीमुळे कोट्यवधी धनगर समाज बांधवांना त्यांच्या हक्कापासून शासन वंचित ठेवत आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. निवेदनावर धनगर समाज आरक्षण कृती समितीचे पदाधिकारी गजानन दहातोंडे, रवींद्र कष्टे, रामेश्‍वर काळे, गजानन बाजड, ज्ञानेश्‍वर खोरणे, गजानन कातडे, राहुल हुले, गजानन बोरकर, रामदास फुके, तुकाराम फुके आदी पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.