शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी धामधूम, दुपारी सामसूम, रात्रीला टामटूम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:40 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने २२ एप्रिलपासून संचारबंदीची सुधारित नियमावली लागू केली असून, सकाळी ७ ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने २२ एप्रिलपासून संचारबंदीची सुधारित नियमावली लागू केली असून, सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची एकच धामधूम सुरू असते. सकाळी ११.३० वाजतानंतर मात्र शहरासह जिल्ह्यातील रस्ते सामसूम राहत असून, रात्री ८ ते १० च्या दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक शहरापासून हाकेच्या अंतरावरील ढाबे, हॉटेलसमोर नागरिकांची काही प्रमाणात ‘टामटूम’ दिसून येते.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदीची सुधारित नियमावली लागू केली असून, त्याची अंमलबजावणीदेखील जिल्ह्यात सुरू झालेली आहे. अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने व दवाखाने वगळता उर्वरित सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी आहे; तर बँक सेवेला सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मुभा आहे. वाशिम शहरातील जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांत सकाळी ९ ते ११ या वेळेत भाजीपाला, किराणा व अन्य वस्तू, साहित्य घेण्यासाठी नागरिकांची एकच धामधूम सुरू राहत असल्याचे गत तीन दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. सर्वाधिक गर्दी ही बँकांसमोर होत असून, येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणत्याही प्रकारे पालन होत नसल्याने गुरुवारी (दि. २२), शुक्रवारी (दि. २३) दिसून आले. या गर्दीवरून कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तुटणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सकाळी ११.३० वाजतानंतर मात्र वाशिम शहरासह सर्वच शहरांतील रस्त्यांवर सामसुम राहत असल्याचे दिसून येते. रात्री ८ ते १० या वेळेत शहराबाहेरील महामार्गालगतची काही हॉटेल व ढाबे येथे ‘मागील दारातून’ तळिरामांची काही प्रमाणात लगबग राहत असल्याचे दिसून येते.

०००

बॉक्स

बँकांसमोरील गर्दी नियंत्रणात आणणे गरजेचे

सकाळी ८ ते ११ या वेळेत मार्केट, भाजीबाजार येथे नागरिकांची गर्दी होत आहे; मात्र सर्वाधिक गर्दी बँकांसमोर होत असून, येथे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचे पालन होत नसल्याचे दिसून येते. या गर्दीवर नियंत्रण मिळविणे आवश्यक ठरत आहे. एका रांगेत विशिष्ट अंतर राखून उभे करणे, ऑनलाईन सुविधा किंवा अन्य प्रभावी माध्यमँद्वारे गर्दी नियंत्रणात कशी येईल, या दृष्टिकोनातून अंमलबजावणी झाली तर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकेल.