शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ढाबे, रेस्टॉरंट हाउसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:40 IST

वाशिम: येत्या ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामीण भागातील राजकीय क्षेत्रात आगळेवेगळे महत्त्व असलेल्या या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गावागावातील उमेदवार जोमाने प्रचार कार्यात भिडले आहेत. यादरम्यान जवळचे कार्यकर्ते तथा मतदारांना खूष ठेवण्यासाठी जेवणावळींचे कार्यक्रम होत असून, महामार्गानजिकचे ढाबे, रेस्टॉरंटमध्येही यानिमित्ताने मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतांमध्येही जेवणावळीची धूमग्राम पंचायत निवडणूक दोन दिवसांवर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येत्या ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामीण भागातील राजकीय क्षेत्रात आगळेवेगळे महत्त्व असलेल्या या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गावागावातील उमेदवार जोमाने प्रचार कार्यात भिडले आहेत. यादरम्यान जवळचे कार्यकर्ते तथा मतदारांना खूष ठेवण्यासाठी जेवणावळींचे कार्यक्रम होत असून, महामार्गानजिकचे ढाबे, रेस्टॉरंटमध्येही यानिमित्ताने मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.ऑक्टोबर-नोव्हेंबर २0१७ मध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यात २७३ ग्राम पंचायतींची निवडणूक  ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा ५३, मालेगाव ४८, रिसोड ४५, मानोरा ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २७ सप्टेंबरला अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी वाशिम तालुक्यातील सरपंच पदाच्या ९४ उमेदवारांनी माघार घेतल्याने २0२ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले. सदस्य पदाच्या २२४ उमेदवारांनी माघार घेतली असून, ७१५ उमेदवार कायम आहेत. मानोरा तालुक्यात सरपंच पदाकरिता दाखल १८५ अर्जांपैकी ५0 जणांनी माघार घेतली; तर सदस्यपदासाठी दाखल ६५९ अर्जांपैकी ९0 उमेदवार माघारी फिरले. कारंजा तालुक्यात सरपंच पदाच्या २३७ पैकी ५६ जणांनी माघार घेतली असून, सदस्य पदाच्या ७३९ उमेदवारांपैकी ७३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. मालेगाव तालुक्यात सरपंच पदाच्या २४२ पैकी ८७; तर सदस्य पदाच्या ८२२ पैकी १६८ जणांनी माघार घेतली. रिसोड तालुक्यात सरपंच पदाच्या २00 अर्जांपैकी ६४ आणि सदस्य पदाच्या ७९९ अर्जांपैकी १६७ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे; तर मंगरूळपीर तालुक्यात सरपंच पदाच्या ७९; तर सदस्य पदाच्या १२९ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता शिल्लक राहिलेल्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच ठिकाणच्या उमेदवारांनी साम-दाम-दंड-भेद ही नीती अवलंबून प्रचारकार्याला वेग दिला आहे. यानुषंगाने मर्जीतील कार्यकर्ते आणि मतदारांवर प्रचंड प्रमाणात खर्चदेखील केला जात असून शेतशिवारांमध्ये जेवणावळीचे कार्यक्रम उरकले जात आहेत. गावापासून जवळच्या महामार्गावरील ढाबे आणि रेस्टॉरंटलाही निवडणुकीच्या निमित्ताने सुगीचे दिवस प्राप्त झाले असून, सकाळपासून रात्री उशिरापर्यंतही गर्दी ओसरत नसल्याचे दिसून येत आहे. 

 प्रचार यंत्रणा झाली ‘हायटेक’!सद्य:स्थितीत शहरीच नव्हे; तर ग्रामीण भागातही अनेकांकडे ‘अँन्ड्राईड मोबाईल’ असून फेसबुक, व्हाट्स अँपचा वापर वाढला आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचारकार्यासाठी त्याचा प्रभावी वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांकडून आयोजित केल्या जाणार्‍या ‘कॉर्नर मिटींग’ असोत अथवा जेवणावळींचे कार्यक्रम, त्याचे निमंत्रण चक्क व्हाट्सअँपच्या माध्यमातून देणे सुरू असल्याने प्रत्यक्ष न भेटताही एकमेकांच्या गोटातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे सुकर झाले आहे. पर्यायाने ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान गटातटात उद्भवणार्‍या वादावरही यामुळे यंदा सोयिस्कररीत्या पांघरूण घातले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.