शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ढाबे, रेस्टॉरंट हाउसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:40 IST

वाशिम: येत्या ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामीण भागातील राजकीय क्षेत्रात आगळेवेगळे महत्त्व असलेल्या या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गावागावातील उमेदवार जोमाने प्रचार कार्यात भिडले आहेत. यादरम्यान जवळचे कार्यकर्ते तथा मतदारांना खूष ठेवण्यासाठी जेवणावळींचे कार्यक्रम होत असून, महामार्गानजिकचे ढाबे, रेस्टॉरंटमध्येही यानिमित्ताने मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतांमध्येही जेवणावळीची धूमग्राम पंचायत निवडणूक दोन दिवसांवर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येत्या ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामीण भागातील राजकीय क्षेत्रात आगळेवेगळे महत्त्व असलेल्या या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गावागावातील उमेदवार जोमाने प्रचार कार्यात भिडले आहेत. यादरम्यान जवळचे कार्यकर्ते तथा मतदारांना खूष ठेवण्यासाठी जेवणावळींचे कार्यक्रम होत असून, महामार्गानजिकचे ढाबे, रेस्टॉरंटमध्येही यानिमित्ताने मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.ऑक्टोबर-नोव्हेंबर २0१७ मध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यात २७३ ग्राम पंचायतींची निवडणूक  ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा ५३, मालेगाव ४८, रिसोड ४५, मानोरा ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २७ सप्टेंबरला अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी वाशिम तालुक्यातील सरपंच पदाच्या ९४ उमेदवारांनी माघार घेतल्याने २0२ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले. सदस्य पदाच्या २२४ उमेदवारांनी माघार घेतली असून, ७१५ उमेदवार कायम आहेत. मानोरा तालुक्यात सरपंच पदाकरिता दाखल १८५ अर्जांपैकी ५0 जणांनी माघार घेतली; तर सदस्यपदासाठी दाखल ६५९ अर्जांपैकी ९0 उमेदवार माघारी फिरले. कारंजा तालुक्यात सरपंच पदाच्या २३७ पैकी ५६ जणांनी माघार घेतली असून, सदस्य पदाच्या ७३९ उमेदवारांपैकी ७३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. मालेगाव तालुक्यात सरपंच पदाच्या २४२ पैकी ८७; तर सदस्य पदाच्या ८२२ पैकी १६८ जणांनी माघार घेतली. रिसोड तालुक्यात सरपंच पदाच्या २00 अर्जांपैकी ६४ आणि सदस्य पदाच्या ७९९ अर्जांपैकी १६७ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे; तर मंगरूळपीर तालुक्यात सरपंच पदाच्या ७९; तर सदस्य पदाच्या १२९ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता शिल्लक राहिलेल्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच ठिकाणच्या उमेदवारांनी साम-दाम-दंड-भेद ही नीती अवलंबून प्रचारकार्याला वेग दिला आहे. यानुषंगाने मर्जीतील कार्यकर्ते आणि मतदारांवर प्रचंड प्रमाणात खर्चदेखील केला जात असून शेतशिवारांमध्ये जेवणावळीचे कार्यक्रम उरकले जात आहेत. गावापासून जवळच्या महामार्गावरील ढाबे आणि रेस्टॉरंटलाही निवडणुकीच्या निमित्ताने सुगीचे दिवस प्राप्त झाले असून, सकाळपासून रात्री उशिरापर्यंतही गर्दी ओसरत नसल्याचे दिसून येत आहे. 

 प्रचार यंत्रणा झाली ‘हायटेक’!सद्य:स्थितीत शहरीच नव्हे; तर ग्रामीण भागातही अनेकांकडे ‘अँन्ड्राईड मोबाईल’ असून फेसबुक, व्हाट्स अँपचा वापर वाढला आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचारकार्यासाठी त्याचा प्रभावी वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांकडून आयोजित केल्या जाणार्‍या ‘कॉर्नर मिटींग’ असोत अथवा जेवणावळींचे कार्यक्रम, त्याचे निमंत्रण चक्क व्हाट्सअँपच्या माध्यमातून देणे सुरू असल्याने प्रत्यक्ष न भेटताही एकमेकांच्या गोटातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे सुकर झाले आहे. पर्यायाने ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान गटातटात उद्भवणार्‍या वादावरही यामुळे यंदा सोयिस्कररीत्या पांघरूण घातले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.