शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

ढाबे, रेस्टॉरंट हाउसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:40 IST

वाशिम: येत्या ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामीण भागातील राजकीय क्षेत्रात आगळेवेगळे महत्त्व असलेल्या या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गावागावातील उमेदवार जोमाने प्रचार कार्यात भिडले आहेत. यादरम्यान जवळचे कार्यकर्ते तथा मतदारांना खूष ठेवण्यासाठी जेवणावळींचे कार्यक्रम होत असून, महामार्गानजिकचे ढाबे, रेस्टॉरंटमध्येही यानिमित्ताने मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतांमध्येही जेवणावळीची धूमग्राम पंचायत निवडणूक दोन दिवसांवर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येत्या ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामीण भागातील राजकीय क्षेत्रात आगळेवेगळे महत्त्व असलेल्या या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गावागावातील उमेदवार जोमाने प्रचार कार्यात भिडले आहेत. यादरम्यान जवळचे कार्यकर्ते तथा मतदारांना खूष ठेवण्यासाठी जेवणावळींचे कार्यक्रम होत असून, महामार्गानजिकचे ढाबे, रेस्टॉरंटमध्येही यानिमित्ताने मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.ऑक्टोबर-नोव्हेंबर २0१७ मध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यात २७३ ग्राम पंचायतींची निवडणूक  ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा ५३, मालेगाव ४८, रिसोड ४५, मानोरा ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २७ सप्टेंबरला अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी वाशिम तालुक्यातील सरपंच पदाच्या ९४ उमेदवारांनी माघार घेतल्याने २0२ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले. सदस्य पदाच्या २२४ उमेदवारांनी माघार घेतली असून, ७१५ उमेदवार कायम आहेत. मानोरा तालुक्यात सरपंच पदाकरिता दाखल १८५ अर्जांपैकी ५0 जणांनी माघार घेतली; तर सदस्यपदासाठी दाखल ६५९ अर्जांपैकी ९0 उमेदवार माघारी फिरले. कारंजा तालुक्यात सरपंच पदाच्या २३७ पैकी ५६ जणांनी माघार घेतली असून, सदस्य पदाच्या ७३९ उमेदवारांपैकी ७३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. मालेगाव तालुक्यात सरपंच पदाच्या २४२ पैकी ८७; तर सदस्य पदाच्या ८२२ पैकी १६८ जणांनी माघार घेतली. रिसोड तालुक्यात सरपंच पदाच्या २00 अर्जांपैकी ६४ आणि सदस्य पदाच्या ७९९ अर्जांपैकी १६७ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे; तर मंगरूळपीर तालुक्यात सरपंच पदाच्या ७९; तर सदस्य पदाच्या १२९ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता शिल्लक राहिलेल्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच ठिकाणच्या उमेदवारांनी साम-दाम-दंड-भेद ही नीती अवलंबून प्रचारकार्याला वेग दिला आहे. यानुषंगाने मर्जीतील कार्यकर्ते आणि मतदारांवर प्रचंड प्रमाणात खर्चदेखील केला जात असून शेतशिवारांमध्ये जेवणावळीचे कार्यक्रम उरकले जात आहेत. गावापासून जवळच्या महामार्गावरील ढाबे आणि रेस्टॉरंटलाही निवडणुकीच्या निमित्ताने सुगीचे दिवस प्राप्त झाले असून, सकाळपासून रात्री उशिरापर्यंतही गर्दी ओसरत नसल्याचे दिसून येत आहे. 

 प्रचार यंत्रणा झाली ‘हायटेक’!सद्य:स्थितीत शहरीच नव्हे; तर ग्रामीण भागातही अनेकांकडे ‘अँन्ड्राईड मोबाईल’ असून फेसबुक, व्हाट्स अँपचा वापर वाढला आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचारकार्यासाठी त्याचा प्रभावी वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांकडून आयोजित केल्या जाणार्‍या ‘कॉर्नर मिटींग’ असोत अथवा जेवणावळींचे कार्यक्रम, त्याचे निमंत्रण चक्क व्हाट्सअँपच्या माध्यमातून देणे सुरू असल्याने प्रत्यक्ष न भेटताही एकमेकांच्या गोटातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे सुकर झाले आहे. पर्यायाने ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान गटातटात उद्भवणार्‍या वादावरही यामुळे यंदा सोयिस्कररीत्या पांघरूण घातले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.