शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

‘डेंग्यू’चा उद्रेक!

By admin | Updated: November 12, 2014 01:51 IST

इंझोरी व इचा येथील बालिकेचा मृत्यू : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.

वाशिम : सध्या सर्वत्र ह्यडेंग्यूह्ण या आजाराने धुमाकूळ घातला असून, रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. वाशिम जिल्हय़ातही डेंग्यूचे सदृश्य रुग्ण मोठया संख्येत आढळून येत असून, हे रूग्ण शासकीय रूग्णालयासह खासगी रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. जिल्हय़ातील मानोरा तालुक्यातील एक व मंगरूळपीर तालुक्यातील एक मुलीचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना ६ ते ११ नोव्हेंबर दरम्यान घडल्यात. गत महिन्यात जिल्हा प्रशासनाकडे चार रुग्ण डेंग्यू आजाराचे असल्याचे निष्पन्न झाले होते; तसेच १३0 डेंग्यूसदृश रूग्ण आढळले. उपचारानंतर हे सर्व रुग्ण मात्र बरे होऊन त्यांची प्रकृती सुधारली होती; मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये या रूग्णांच्या संख्येमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून, आरोग्य विभागाच्यावतीने डेंग्यू आजार नियंत्रणाबाबत उपाय योजना सुरू आहेत. घर व घराच्या परिसरातील अस्वच्छता, साचलेले धरण पाण्याचे डबके भंगारात पडलेले टायर, पाणी साचलेले कूलर अशा विविध कारणांमुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूसारखा महाभयंकर आजार होण्याची शक्यता असते. डासांच्या चावल्यामुळे ताप येणे, डोके दुखणे, सर्दी होणे अशक्तपणा येणे अशीही सुरुवातीची लक्षणे साधा डेंग्यू म्हणून ओळखली जातात, यानंतर त्या रुग्णांना वांती होणे, लघवीतून रक्त जाणे, अंगावर रक्ताचे लाल रंगाचे डाग पडणे, हे डेग्यूंची दुसरी पायरी होय.तर डेंग्यू शॉक सिंद्रोम म्हणजेच शंभर टक्के डेग्यूंचा आजार जडलेला रुग्ण होय. यामध्ये रुग्णांना श्‍वासोच्छवास होण्यास त्रास होतो, ही तिसरी पायरी आहे. या परिस्थितीमध्ये पोहोचलेल्या रुग्णास ह्यफ्रेश प्लेटलेटह्ण देऊन उपचार केला जातो. सद्यस्थितीत डेंग्यूची भीती सर्वसामान्यांत दिसून येत आहे. आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.