शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

रस्ता कामाची पाहणी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:28 IST

कामरगावात बसस्थानक ते लाडेगाव ॲटो पाॅईंट हा वर्दळीचा व महत्त्वाचा रस्ता असून सन २००९-१० मध्ये आ. राजेंद्र पाटणी यांच्या ...

कामरगावात बसस्थानक ते लाडेगाव ॲटो पाॅईंट हा वर्दळीचा व महत्त्वाचा रस्ता असून सन २००९-१० मध्ये आ. राजेंद्र पाटणी यांच्या निधीतून या रस्त्याचे सा. बां विभागाच्या वतीने काम करण्यात आले होते. तेव्हापासून तर आतापर्यंत जवळपास १२ वर्ष या रस्त्याची डागडुजी करण्यात न आल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले व रस्त्यातील लोखंडी सळा बाहेर आल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. सन २०१७ मध्ये आ. पाटणींनी पुन्हा या रस्त्यासाठी २० लाखाचावर निधी उपलब्ध करून दिला. परंतु संबंधित विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे जवळपास चार वर्ष या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. अखेर १५ जून रोजी सा. बां. विभागाला या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यास मुहूर्त गवसला आणि कामास प्रारंभ झाला. उद्घाटनावेळी रस्त्याच्या कामात टाकण्यात आलेल्या लोखंडी सळीच्या चटईत दोन लोखंडी सळीमधील अंतर एक फूट होते परंतु उद्घाटन संपले आणि दोन सळीतील अंतर दोन फूट करण्यात आले. एवढेच नव्हे तर बारा वर्षांनंतर झालेल्या या रस्त्याच्या कामात मातीमिश्रीत डस्ट वापरण्यात आल्याने या रस्त्याच्या भविष्यातील मजबुतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रस्ता निर्मितीवेळी रस्त्याची उंची कमी करण्यात आल्याचा तसेच रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे व थातूरमातूर करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांतून केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित कंत्राटदाराने चार दिवसांत ४०० मीटर रस्त्याचे काम पूर्ण केले असून या चार दिवसांत सदर रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याकरीता सा. बां. विभागाचा एकही अधिकारी फिरकला नाही. या रस्त्याच्या कामाची चैाकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.