शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विमुक्त जातीला तत्काळ नॉन क्रिमिलेअरमधून वगळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:27 IST

मानोरा : केंद्र सरकारच्या ८ सप्टेंबर १९९३ च्या सूचनेनुसार विमुक्त जातीमधील समुदायांना नॉन क्रिमिलेअरमधून वगळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने भाटीया ...

मानोरा : केंद्र सरकारच्या ८ सप्टेंबर १९९३ च्या सूचनेनुसार विमुक्त जातीमधील समुदायांना नॉन क्रिमिलेअरमधून वगळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने भाटीया कमिटी नियुक्त केली. भाटीया कमिटीने महाराष्ट्र सरकारला २८ ऑक्टोबर २०१४ ला अहवाल दिला. सदर अहवालावर तारीख ५ ऑक्टाेबर २०१७ ते २६ ऑक्टाेबर २०१७ दरम्यान सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या, यावर सूचना व हरकती प्राप्त झाल्या नाहीत. सरकारने विमुक्त जातीच्या नागरिकांना हेतुपुरस्सरपणे नॉन क्रिमिलेअरमध्ये जखडून ठेवले आहे. हा विमुक्त जातीच्या नागरिकांवर अन्याय आहे, असा आरोप राष्ट्रीय बंजारा विकास मिशनचे अध्यक्ष देवराव राठोड यांनी केला आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांना १ जुलै रोजी पाठविलेल्या निवेदनात राठोड यांनी विमुक्त जातीला तत्काळ नॉन क्रिमिलेअरमधून वगळण्याची मागणी केली आहे.

नॉन क्रिमिलेअरच्या जाचक अटीमुळे समाजातील मुलामुलींचे शिक्षण आणि नोकरीत अडथळा येत आहे. महाराष्ट्र सरकारने महसूल व वन विभागाला ४ जानेवारी २०२१ दिलेल्या आदेशानुसार निर्णय घेऊन समस्त नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र सदर आदेशाप्रमाणे महसूल आणि सेतू सुविधा केंद्राकडून पालन होत नसून नागरिकांना नॉन क्रिमिलेअर देताना आई-वडील यांचे शेती व नोकरीचे उत्पन्न वगळता अर्जदाराचे अन्य स्रोत विचारात घेणे आवश्यक आहे, असे स्पष्टपणे अधिसूचनेत नमूद असताना महसूल व सेतू सुविधा केंद्राकडून पालन होत नाही. याकरिता तत्काळ परिपत्रक काढून राज्यभर सूचना द्याव्यात. जेणेकरून विमुक्त भटक्या समाजालाच नव्हे, तर संपूर्ण ओबीसी समाजाला दिलासा मिळेल. केंद्र सरकारने ६ लाखांची उत्पन्न मर्यादा वाढवून ८ लाख केली आहे, मात्र या स्थितीला तीन वर्षे झाली आहेत. त्यामुळे ८ लाखांवरून १२ लाख मर्यादा करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.