शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:43 IST

पीकविमा कंपनीने पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांचा विमा तातडीने त्यांच्या बँक खाती जमा करावा, अशी मागणी शेतकरीहीत संरक्षण समितीचे नितीन पा. ...

पीकविमा कंपनीने पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांचा विमा तातडीने त्यांच्या बँक खाती जमा करावा, अशी मागणी शेतकरीहीत संरक्षण समितीचे नितीन पा. उपाध्ये यांनी केली आहे.

गतवर्षी काजळेश्वर, उकर्डा , पानगव्हाण, महागाव, जानोरी, उजळेश्वर, पारवा शिवारात सोयाबीन सोंगणीवेळी अवकाळी पाऊस अतिवृष्टी स्वरूपात आला. त्यामुळे शेतातच शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक सडले. काढलेले सोयाबीन ढेपीसारखे झाले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीचा मेसेज ७२ तासांच्या आत कंपनीला दिले. कृषी सहाय्यक, पटवारी, पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी फोटो काढून पंचनामे करून अहवाल पाठविला.

मात्र काही शेतकऱ्यांनाच याचा लाभ दिला, तर काहींना अत्यल्प लाभ मिळाला . जर १०० टक्के नुकसान असेल हेक्टरी पंचेचाळीस हजार लाभ मिळतो, मात्र विमा कंपनीने मनमानी करून अनेक शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले. वास्तविक ९०० रु. हेक्टरी शेतकरी हिस्सा व ५१७५ रु. शासन हिस्सा असा ६०७५ रु. हेक्टरी विमा कंपनीकडे जमा होतात. शेतकऱ्यांनी ९०० रु. त्याचा हेक्टरी हिस्सा पीकविमा भरला नाही तर शासनाचा हिस्सा विमा कंपनीला जमा होत नाही म्हणून शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी गाजावाजा केला जातो. मात्र नुकसानभरपाई देताना विमा कंपनी शेतकऱ्यांना अनेक कारणे सांगून त्याला लाभापासून वंचित ठेवतात. तेव्हा शासनाने सरळ सरळ त्यांचा हिस्सा शेतकऱ्यांना सरसकट द्यावा व विमा कंपनीला शेतकरी नुकसानभरपाई विम्याद्वारे देण्यास बाध्य करावे, अशी मागणी शेतकरी उपाध्ये यांनी पीकविमा कंपनीकडे केली आहे.