शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरचे ५०० 'व्हायल' उसने देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:43 IST

अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांना प्रत्येकी ५०० व २५० व्हायल उसनवारीवर देण्याचे आदेश आयुक्तांनी संबधितांना दिले आहेत. तोच ...

अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांना प्रत्येकी ५०० व २५० व्हायल उसनवारीवर देण्याचे आदेश आयुक्तांनी संबधितांना दिले आहेत. तोच न्याय वाशिमला का नाही? असा सवालही घोपे यांनी उपस्थित केला आहे. अमरावती विभागातील वाशिमसह सर्वच पाचही जिल्ह्यांत आजमितीला कोरोनाने कहर माजविला आहे. दैनंदिन चाचण्यांपैकी सुमारे १५ ते २० टक्क्यांपेक्षाही अधिक चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. परिणामी सक्रिय रुग्णसंख्येचा आलेख सतत चढता असून खाटा, औषधींचा तुटडा पडत आहे. कोरोनाच्या आजारावर काहीअंशी रामबाण ठरत असलेल्या रेमडेसिविरची टंचाई तर प्रचंड वाढली आहे. बुलडाण्याचा अपवाद वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत रेमडेसिविर मिळत नाहीत. नेमकी हीच बाब हेरून अकोल्याच्या एका विधिज्ञांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने अकोला जिल्ह्यासाठी तीन हजार रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याचे सरकारला आदेशित केले. त्यानुसार सदर इंजेक्शन अकोल्यात पोहोचले. मात्र, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांची गरज लक्षात घेता विभागीय आयुक्तांनी यातील ५०० व्हायल अमरावतीला, तर २५० व्हायल यवतमाळला उसने देण्याचे संबधितांना आदेशित केले आहे. अमरावती, यवतमाळच्या तुलनेत वाशिम जिल्ह्याला मिळणारे रेमडेसिविर कमी आहेत. रुग्ण संख्या मात्र लोकसंख्येच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या धर्तीवर वाशिमला ५०० व्हायल उसने देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी घोपे यांनी आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.