शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

नुकसानाच्या अंतीम अहवालास लागणार विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 14:51 IST

नुकसानाचे अंतीम अहवाल तयार करून ते विभागीय आयुक्त व पिकविमा कंपन्यांकडे पाठविण्यास विलंब लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसानाच्या लिखीत पंचनाम्यांमध्ये बऱ्याच त्रुटी असून त्या पूर्ण करताना तहसील व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. यामुळेच तुलनेने अधिक प्रमाणात असलेल्या नुकसानाचे अंतीम अहवाल तयार करून ते विभागीय आयुक्त व पिकविमा कंपन्यांकडे पाठविण्यास विलंब लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७४ हजार ३५७ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ३१ हजार ५६२, रिसोड ३४ हजार २८७, मालेगाव ३० हजार १६९, मंगरुळपीर २९ हजार २७४, मानोरा १६ हजार ८४९ आणि कारंजा तालुक्यातील ३२ हजार २१६ शेतकºयांचा समावेश आहे. झालेल्या पिकांच्या नुकसानाचे तलाठ्यांनी पंचनामे करून ते तहसील व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांकडे ८ नोव्हेंबर या अंतीम मुदतीपर्यंत सादर केले आहेत. दरम्यान, ज्या शेतकºयांनी खरीप हंगामात पिकविमा काढलेला नाही, परंतु त्यांच्या पिकांचे नुकसान झाले, असे शेतकरी व पिकविमाधारक शेतकºयांच्या नुकसानाच्या या पंचनाम्यांची ९ नोव्हेंबरपासून प्रशासकीय पातळीवर तथा युद्धस्तरावर पडताळणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सहाही तहसील कार्यालये आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये पुरेशा प्रमाणात संगणक, कंत्राटी तत्वावरील संगणक परिचालकांची सोय उपलब्ध करण्यासह कर्मचाºयांच्या सुट्या रद्द करून तथा तलाठी, ग्रामसेवकांना बोलावून अचूक पंचनाम्यांची ‘डाटा एन्ट्री’ करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असल्याचे रविवारी देखील दिसून आले. प्रत्यक्षात मात्र नुकसानाचे आणि पंचनाम्यांचे प्रमाण कितीतरी पटीने अधिक असल्याने अंतीम अहवाल तयार करून ते विभागीय आयुक्त आणि पिकविमा कंपन्यांकडे पाठविण्यास बराच विलंब लागणार आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत मिळण्यासही प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे एकंदरित चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांची कामे ८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, हे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. काही गावांमधील थोड्याफार प्रमाणातील पंचनामे अद्याप बाकी असून ते देखील सोमवारपर्यंत पूर्ण होतील. दरम्यान, लिखीत स्वरूपातील नुकसानाच्या पंचनाम्यांची आता ‘डाटा एन्ट्री’ केली जात असून त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. तहसील कार्यालये, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयातही हे काम सुरू आहे. ‘डाटा एन्ट्री आॅपरेटर’ आणि पुरेशा प्रमाणात संगणकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.- ऋषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती